‘तरुण भारत इफेफ्ट’
प्रतिनिधी /कुडचडे
कुडचडे येथे नुकतेच मुसळधार पावसामुळे आणि विविध प्रभागांत मान्सनपूर्व कामे व्यवस्थित न झाल्याने पाणी तुंबण्याचे प्रकार दिसून आले. यामुळे लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यात कुडचडेतील सर्वोदय हायस्कूलसमोर बऱयाच प्रमाणात पाणी साचले होते व विद्यार्थ्यांना या पाण्यातून ये-जा करावी लागत होती. यावर ‘तरुण भारत’मध्ये वृत्त प्रकाशित झाल्यावर तसेच पालिकेकडे तोंडी तक्रार केल्यानंतर त्याची दखल घेत कुडचडे पालिका निरीक्षक धीरज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सदर हायस्कूलसमोरील माती साचून तुंबलेले गटार कामगारांना वापरून साफ करण्यात आले. तुंबलेले गटार साफ करण्यात आल्याबद्दल पालकांनी समाधान व्यक्त केले असून या समस्येवर प्रकाश टाकल्याबद्दल ‘तरुण भारत’ला धन्यवाद दिले आहेत.