बेळगाव : जिल्हाधिकारी कार्यालय येथील भुयारी मार्गामध्ये मनपाकडून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. भुयारी मार्गाचा उपयोग होत नसल्यामुळे याठिकाणी अनेक जण लघुशंका करत आहेत. त्यामुळे येथे अस्वच्छता निर्माण होऊन दुर्गंधी पसरली होती. याची दखल घेऊन स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. न्यायालयात ये-जा करण्यासाठी भुयारी मार्ग निर्माण करण्यात आला होता. मात्र, या मार्गाचा कोणीच उपयोग करीत नसल्याने भुयारी मार्ग तसाच पडून आहे.यासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च करूनही उपयोग होत नसल्याने शासनाचा निधी वाया गेल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. न्यायालयात ये-जा करणाऱ्या नागरिकांसह वकिलांना हा मार्ग सोयीचा होईल. रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर होईल. या दृष्टीने हा मार्ग निर्माण करण्यात आला होता. मात्र, अपेक्षेनुसार उपयोग होत नसल्याने भुयारी मार्ग वापराविना पडून आहे.
Previous Articleकारवार जिल्ह्यात दरडी कोसळण्याच्या घटना
Next Article सातबाऱ्याला आधार लिंकसाठी वर्दळ
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.