ऑनलाईन टीम / हिंगोली :
चालू आर्थिक वर्षात 25 हजार उद्योगांसाठी (25 thousand industries) मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत (cm employment generation program) कर्ज दिले जणार आहे. त्यामुळे किमान 2.50 लाख बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे. मागील वर्षी राज्यात या योजनेअंतर्गत 6 हजार लाभार्थींना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यानंतर आता या वर्षात उद्दिष्टात चारपट वाढ करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackreay) यांनी यासंदर्भात माहिती दिली.
कोरोनाकाळात अनेकांच्या नोकऱया गेल्या. अनेक छोटे-मोठे उद्योग बंद पडले. त्यामुळे बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत जास्तीत जास्त उद्योगांना कर्ज देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत जिल्हा उद्योग केंद्र तसेच खादी ग्रामोद्योग यामार्फत कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामध्ये सेवा, उत्पादन उद्योगांसाठी 10 लाख ते 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यासाठी विविध बँकांकडे लाभार्थींचे प्रस्ताव पाठवले जाणार आहेत.
एका उद्योगातून किमान 10 बेरोजगारांना रोजगार देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. चालू आर्थिक वर्षात 25 हजार उद्योगांसाठी कर्ज दिले जाणार असल्यामुळे किमान 2.50 लाख बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे. राज्यात चालू आर्थिक वर्षात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत 25 हजार बँकांमार्फत उद्योगांसाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यातून किमान 2.50 लाख बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
राज्यात जिल्हानिहाय उद्योगांना दिलेले कर्जाचे उद्दिष्ट
सातारा 580, सांगली 870, कोल्हापूर 1200, पुणे 140, ठाणे 950, सोलापूर 1000, नाशिक 1000, अहमदनगर 900, धुळे 500, जळगाव 850, नंदुरबार 400, औरंगाबाद 950, बीड 600, जालना 750, उस्मानाबाद 650, नांदेड 800, परभणी 600, हिंगोली 500, लातूर 650, अमरावती 800, अकोला 750, बुलडाणा 500, वाशीम 350, यवतमाळ 600, नागपूर 900, चंद्रपूर 600, भंडारा 450, गडचिरोली 300, गोंदिया 500, वर्धा 500