ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाची तातडीने बैठक बोलावली आहे. सर्व कार्यक्रम रद्द करून मुंबईत हजर राहा, असे आदेश शिंदे यांनी सर्व मंत्र्यांना दिले आहेत. ही बैठक नेमकी कोणत्या कारणासाठी बोलावण्यात आली आहे, हे अद्याप समजू शकले नाही. मात्र, सर्व मंत्री आपले दौरे अर्धवट सोडून मुंबईला रवाना झाले आहेत. दुपारी 1 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक होणार असल्याचे सांगण्यात येते.
मराठा आरक्षणासंदर्भातील पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. राज्य सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जात असून, मराठा आरक्षणाचे भवितव्य आता अधांतरी असल्याचे दिसते. त्यामुळे राज्य सरकार पुन्हा मराठा आरक्षणासंदर्भात पुनर्विचार याचिका दाखल करण्यावर या बैठकीत चर्चा होऊ शकते.
अधिक वाचा : विदर्भाला ‘यलो अलर्ट’; कमाल तापमान घटणार