ऑनलाईन टीम/ तरुण भारत
आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो, कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही परत या असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (CM Uddhav Thackeray)यांनी बंडखोर आमदारांना केलं आहे.आज शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर (Deepak Kesarkar)यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भेटून पक्षा संदर्भात निर्णय घ्या आणि आम्हाला निर्णय द्या. आमचा संयमाचा बाण तुटला आहे अशी विनंती केली आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी भावनिक साद घालत बंडखोरांना परत बोलावले आहे. यावर आता बंडखोर परत येणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
हेही वाचा- जबरदस्तीने बाहेर पाठवून गद्दारांचा शिक्का मारतायं; केसरकारांचा ठाकरे आणि राऊतांवर हल्लाबोल
नेमके काय म्हणाले मुख्यमंत्री
आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात. आपल्या बाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे, आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत आपण आजही मनाने शिवसेनेत आहात आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत. आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो. कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही , माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे आपण या माझ्या समोर बसा , शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा. यातून निश्चित मार्ग निघेल आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू . कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका. शिवसेनेने जो मान सन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही. समोर आलात बोललात तर मार्ग निघेल . शिवसेना पक्ष प्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे . समोर येऊन बोला आपण मार्ग काढू असे आवाहन त्यांनी दिले.