ऑनलाईन टीम/तरुण भारत
राहुल गांधी परदेशात भारताबद्दल वाईट बोलतात तर, अखिलेश यादव यूपी सोडून दुसऱ्या राज्यात जाऊन यूपीबद्दल वाईट बोलतात. दोघांच्या याच सवयीमुळे राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्यात फारसा फरक नाही. असे वक्तव्य मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी आपल्या भाषणात केले आहे. उत्तर प्रदेश विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना त्यांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्यासह काॅंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर निशाणा साधला.
अखिलेश यादव यांनी गोमातेबाबत केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना योगी आदित्यनाथ म्हणाले, मला वाटते की, विरोधी पक्षनेत्याने गोमातेची सेवा केली असती, तर ते गोमातेच्या कल्याणाची भाषा बोलले असते. असा टोलाही लगावला. विरोधी पक्षनेत्याचे भाषण अर्थसंकल्पावर असते तर बरे झाले असते, पण ते अधिवेशनाचा भाग झाले असते, असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच आम्ही कोणत्याही जाती-धर्माच्या आधारावर फूट पाडली नसल्याचेही योगी यांनी यावेळी स्पष्ट केले.
पुढे बोलताना ते म्हणाले, विरोधी पक्षाचे नेते म्हणतात की, हा समाजवाद आहे. मात्र, यानिमित्ताने का होईना, विरोधकांनी पंतप्रधानांच्या गरीब कल्याण कार्यक्रमाचे कौतुक केले, असा टोला लगावला. अधिवेशना दरम्यान पंतप्रधान मोदींच्या माध्यमातून चालवणाऱ्या जाणाऱ्या योजनांवर चर्चा झाली. यावेळी विरोधकांवर निशाणा साधला.