पुणे / प्रतिनिधी :
Cold will increase in Maharashtra महाराष्ट्र तसेच मध्य प्रदेशमध्ये पुढील दोन दिवस थंडीचा जोर कायम राहणार असून, त्यानंतर मात्र किमान तापमानाचा पारा 2 ते 3 अंश सेल्सिअसने घसरण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे राज्यभरात आता लवकरच गारठा तीव्र होणार आहे. दरम्यान, नाशकात मंगळवारी सर्वात कमी 13.3 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविण्यात आले.
उत्तरेकडच्या अनेक राज्यांत बर्फवृष्टी सुरु आहे. जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टीस्थान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडच्या भागात 10 नोव्हेंबरपर्यंत बर्फवृष्टी वाढणार आहे. याशिवाय दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंदीगड, राजस्थानच्या भागातसही पावसाची शक्यता आहे. यामुळे दोन दिवसांत उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यात अधिक वाढ होणार असल्याने मध्य प्रदेश तसेच महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार आहे.
अधिक वाचा : साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवृत्त न्या. नरेंद्र चपळगावकर
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र, दक्षिणेत पाऊस
दक्षिण पश्चिम बंगालच्या उपसागरात हवेची द्रोणीय स्थिती असून, येत्या 48 तासांत त्याचे कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतर होणार आहे. याच्या प्रभावामुळे तामिळनाडू, पाँडेचरी,कराईकल, रायलसीमा, दक्षिण आंध्र प्रदेशच्या भागात मुसळधार पावसाचा इशारा आहे. याशिवाय किनारपट्टीवर वेगाने वारे वाहणार असल्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.