बेंगळूरमध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते शुभारंभ, 11 राज्यांमध्ये मिळणार
बेंगळूर / वृत्तसंस्था
वाहने चालविण्यासाठी मद्यार्क (इथेनॉल) मिश्रीत पेट्रोल पुरवठा करण्याच्या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या उपक्रमाचे उद्घाटन येथील एका शानदार कार्यक्रमात सोमवारी केले. या कार्यक्रमाला कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई उपस्थित होते. अशा प्रकारचे पेट्रोल 11 राज्यांमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यामुळे इंधनासंबंधातील देशाचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार आहे.
पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण करण्याची पद्धती काही वर्षांपासून लागू करण्यात आली आहे. सध्या इथेनॉल प्रमाण 1.5 टक्के निर्धारित करण्यात आले आहे. मात्र नजीकच्या भविष्यकाळात ते 20 टक्क्यांपर्यंत नेण्याची योजना आहे. हे इंधन सोमवारपासून 11 राज्यांमधील 15 शहरांमध्ये उपलब्ध होणार आहे. त्यानंतर काही काळातच ते देशभरात उपलब्ध केले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
पुनउ&पयोगी इंधनाची योजना
या उपक्रमाचे उद्घाटन केल्यानंतर केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकारच्या इंधनविषयक धोरणांची आणि योजनांची माहिती दिली. भारत पर्यावरणस्नेही आणि पुनऊपयोगी तसेच देशी निर्मितीच्या इंधनावर भर देत आहे. इथेनॉल निर्मिती, स्वच्छ हैड्रोजन निर्मिती, नैसर्गिक वायूचा इंधन म्हणून उपयोग, गोबर गॅसचा उपयोग आदी प्रकारे भारत इंधन क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न करीत आहे. येत्या पाच वर्षांमध्ये पर्यावरणस्नेही इंधन निर्मितीला मोठी चालना दिली जाईल. विजेवर चालणाऱया वाहनांनाही प्रोत्साहन दिले जाईल. भारतात अशा वाहनांसाठी लागणाऱया बॅटऱया निर्माण करण्यासाठी 35 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे ध्येय ठेवण्यात आले आहे, अशी उपयुक्त माहिती त्यांनी दिली.
ई-20 इंधन काय आहे ?
पेट्रोलमध्ये एका निश्चित प्रमाणात इथेनॉचे मिश्रण करण्याला ई-20 इंधन अशी संज्ञा आहे. प्रारंभीच्या काळात 1.5 टक्के इथेनॉल मिश्रणाचा प्रयोग करण्यात आला होता. आता टप्प्याटप्प्याने हे प्रमाण वाढविण्यात येणार असून ते 20 टक्क्यांपर्यंत नेण्याची योजना आहे. त्यानंतरच्या टप्प्यात ते 85 टक्के इथेनॉल आणि 15 टक्के पेट्रोल अशा प्रमाणात नेण्याचीही योजना आहे. इथेनॉलची निर्मिती देशातच केली जाते. त्याच्या मिश्रणामुळे कच्च्या इंधन तेलाची आयात कमी होईल. परिणामी, देशाच्या अर्थव्यवस्थेवरील भार कमी होऊन परकीय चलन वाचणार आहे.
कोणत्या राज्यांमध्ये मिळणार
केंद्र सरकारच्या सध्याच्या योजनेनुसार हे इ-20 इंधन 11 राज्यांच्या 15 शहरांमध्ये मिळणार आहे. दिल्ली, हिमाचल प्रदेश, बिहार, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हरियाणा, कर्नाटक, महाराष्ट्र, पंजाब, दमण-दीव आणि दादरा-नगरहवेली यांचा या राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये समावेश आहे. पेट्रोल विकणाऱया कंपन्यांच्या 84 आऊटलेट्सवर सध्या ते उपलब्ध केले जाणार आहे.
कोणत्या गाडय़ांमध्ये चालणार
हे इंधन हय़ूंडाई कंपनीच्या ग्रँड आय 10 नियोस, ऑरा, पेटा, व्हेन्यू आणि एक्लाजार या चार चाकी गाडय़ांमध्ये (कार्स) चालणार आहे. तर होंडा कंपनीची ऍक्टिव्हा स्मार्ट आणि हीरो कंपनीची मेस्ट्रो झूम या दुचाकी गाडय़ाही या इंधनावर चालू शकतात. याशिवाय मारुती सुझुकी वॅगनआर, एफएफव्ही आणि टोयोटा कोरोला अल्टिस, सुझुकी जिक्सर 250, होंडा एक्सआरई 300 रॅली, हीरो ग्लॅमर एक्स टेक, बजाज पल्सर, एसएस 160, यामाहा एफ झेड-15 एबीएस, टीव्हीएस अपाचे आरटीआर 160, 4 व्ही आदी गाडय़ाही यावर धावू शकतात. या गाडय़ांचे प्रदर्शन नुकत्याच पार पडलेल्या ऑटॉ एक्स्पोमध्ये करण्यात आलेले आहे.
जुन्या गाडय़ांनाही उपयुक्त
आज भारतातील मार्गांवर ज्या जुन्या गाडय़ा धावत आहेत, त्यांच्यामध्येही काही सोपे परिवर्तन करुन त्या या मिश्र इंधनावर चालू शकतील. मात्र या इंधनामुळे मायलेज काही प्रमाणात कमी होईल. येत्या एप्रिलपासून देशात केवळ फ्लेक्स इंधनक्षम गाडय़ाच विकल्या जाऊ शकणार आहेत. त्यामुळे आणखी काही वर्षांनी या गाडय़ांची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढणार आहे. जुन्या गाडय़ांमध्ये कोणते बदल करावे लागणार याची माहिती संबंधित इच्छुकांना दिली जाणार आहे.
या फ्लेक्स इंधनाचा लाभ काय
इथेनॉलमिश्रित अशा या ई-20 किंवा फ्लेक्स इंधनाचे अनेक लाभ आहेत. या इंधनामुळे प्रदूषण कमी होईल. कार्बन मोनॉक्साईड या विषारी वायूचे प्रमाण 35 टक्के कमी होईल. या इंधनाची किंमत कमी असल्याचे सर्वसामान्यांना ते सोयीचे असेल. इथेनॉलची निर्मिती कृषीउत्पादनांपासून होत असल्याने शेतकऱयांच्या उत्पन्नात भर पडेल. भारताचे इंधनातील स्वाललंबित्व वाढेल आणि इंधन तेलाची आयात कमी करावी लागल्याने देशाचा पैसा वाचणार आहे.
स्वदेशी इंधनावर भर
ड इंधन क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यावर केंद्र सरकार भर देणार
ड इथेनॉल मिश्रित इंधनामुळे शेतकऱयांना होणार मोठा लाभ
ड कच्च्या इंधनाची आयात कमी होणार, देशालाही लाभ