बेळगाव – बेळगाव येथील मार्केट पोलीस ठाण्यासमोरील कृषी भवनात शेती सोडून अन्य व्यावसायिक कामे केली जात असल्याचा आरोप करत शेतकरी संघटनेतर्फे आज आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप करत सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करत घोषणाबाजी करण्यात आली. याची माहिती शेतकर्यांना माहिती हक्काच्या माध्यमातून मिळाली आहे.1966 मध्ये शासनाकडून 24.24 गुंठे जमिनीवर हे कृषी भवन बांधण्यात आले. येथे भाडेतत्त्वावरील 6 कामांसाठी सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र पट्टेदारांसोबत अंतर्गत तोडगा काढण्यात आला आहे. सरकारला वर्षाला फक्त 5,40,000/- दिले जातात. मात्र दरमहा ४२ हजार उत्पन्न येथे होतो. सार्वजनिक बांधकाम विभाग गप्प का बसला आहे? मृदा परीक्षण केंद्र, बियाणे वाटप केंद्र, शेतकऱ्यांसाठी विश्रामगृह आणि कोल्ड स्टोरेज इथे असायला आवश्यक होते. मात्र त्या ऐवजी व्यावसायिक कामे सुरू झाली आहेत, असा दावा शेतकरी नेत्या जयश्री गुरन्नवर यांनी केला आहे.
Trending
- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बेळगाव दौऱ्यात बदल
- दोन भावांचे मृतदेह सापडल्याने खळबळ
- सांकवाळ येथे 27 रोजी पंतप्रधानांची महासभा
- निवडणूक काळात आतापर्यंत 16 कोटींचा मुद्देमाल जप्त
- राष्ट्रप्रतिकांचा आम्ही नव्हे, भाजपच अवमान करतेय!
- विरियातो वसाहतवादी मानसिकतेचे सराईत दुतोंडे
- मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
- वृद्ध, दिव्यांग, अंध मतदारांची मते आजपासून पेटीबंद