बेळगाव प्रतिनिधी – वेळेत वेतन द्यावे, केंद्र सरकारने निधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करावा,कामगार व सुपरवायझर यांना स्मार्टफोन द्यावे, साहित्याच्या दरामध्ये वाढ करावी. यासह इतर मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. वेळेत वेतन दिले जात नाही, ग्रामपंचायत मधील पीडीओकडे काम द्या म्हणून गेले असता काम नाही असे सांगितले जात आहे. केंद्र सरकारने रोजगार हमी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या निधीमध्ये कपात केली आहे. त्यामुळे आम्हाला काम मिळणे कठीण झाले आहे. तेव्हा केंद्र सरकारने रोजगार हमी योजनेच्या निधीमध्ये वाढ करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे एम.जे.जेनेखान, जी.व्ही. कुलकर्णी, सी. ए. खराडे, एल.एस.नाईक ,लिंगाप्पा संगोळी, दिलीप वारके, निवास खोत, प्रवीण नाईकवडी यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते.
Trending
- सलून व्यावसायिकाचा कोल्हापूर लोकसभेसाठी अर्ज दाखल! सायकलवरून अर्ज भरून दिला पर्यावरणाचा संदेश
- महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना मोठया मताधिक्य देण्यासाठी कामाला लागा- मंत्री चंद्रकांत पाटील
- अत्यंत साध्यापद्धतीने काँग्रेस उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांनी भरला उमेदवारी अर्ज
- नेसरी पोलिसांकडून आंतरराज्य टोळीतील म्होरक्यासह चौघे जेरबंद
- जिल्ह्यात पारा गाठू शकतो 42 अंश उन्हाच्या तडाख्यापासून वाचणार कसे..?
- संजय मंडलिक श्रीराम चरणी लीन! रामनवमीनिमित्त कागलसह कोल्हापूर मधील उत्सवात सहभाग
- काँग्रेसचे खलप, विरियातो यांचे अर्ज सादर
- वेदांतासोबतच्या कराराबाबत गोवा फाऊंडेशनची तक्रार