Tarun Bharat

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना १०० सेकंद स्तब्ध राहून सामुदायिक अभिवादन

 कसबा बीड /प्रतिनिधी

 लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी आपल्या दूरदृष्टिकोनातून विकासबद्द केलेल्या करवीर संस्थांनामुळे आज शंभर वर्षानंतर हे कोल्हापूर जिल्हा, कला-क्रीडा, पर्यटन आदी सर्व क्षेत्रात समृद्ध झाला आहे. या सर्व बाबीचे श्रेय फक्त आणि फक्त राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांना जाते. महाराजांनी दिलेल्या समतेच्या शिकवणीमुळे कोल्हापुरात सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गविंदाने राहत आहेत. आपल्या सर्वांचे जीवन समृद्ध करणाऱ्या लोकराजाला त्याच्या स्मृती शताब्दी निमित्त अभिवादन करण्यासाठी संपूर्ण कोल्हापूर जिल्हा सरसावला आहे.

यामध्ये कसबा बीड भागातील पाडळी खुर्द, कोगे, कसबा बीड, शिरोली दुमाला, चाफोडी या भागातील सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी सर्व संस्थांचे पदाधिकारी तसेच युवक व ग्रामस्थ यांच्या वतीने लोकराजा शाहू महाराजांना सकाळी दहा वाजता शंभर सेकंद स्तब्ध उभे राहून अभिवादन करण्यात आले. अशा या दूरदृष्टी राजाला कोटी कोटी प्रणाम.

Related Stories

खंडोबा तालमीचे माजी अध्यक्ष सुरेश जरग यांचे निधन

Abhijeet Khandekar

राज्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचा मार्ग मोकळा

Archana Banage

पाचगावमधील व्यक्ती टिंबर मार्केट परिसरातील कोरोना मृत महिलेच्या संपर्कात

Archana Banage

Kolhapur; कोगे- कुडित्रे आणि महे- कसबा बीड पुलावर दुसऱ्यांदा पाणी; पूरामुळे वाहतूक बंद

Abhijeet Khandekar

महापालिकेचे 60 प्रभाग थेट आरक्षित

Kalyani Amanagi

म्हासुर्लीतील आरोग्य केंद्र इमारत खुदाईत पाईप लाईन फुटल्याने पाणीटंचाई

Archana Banage