प्रतिनिधी / बेळगाव : वीज खाजगीकरणाचा कायदा केंद्र सरकार आणण्याचा प्रयत्न करत आहे. हा कायदा लागू झाला तर शिवारातील विद्युत पंपांना मीटर बसवले जाणार आहेत. तेव्हा हा कायदा मागे घ्यावा. शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. त्यांना नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफी करावी. यासह इतर मागण्यांसाठी नेगील योगी रयत सेवा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.
शेतकरी वनविभागातील जमिनीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पिके घेत आहेत. मात्र आता ती जमीन काढून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. तेव्हा संबंधित शेतकऱ्याला ती जमीन कायमस्वरूपी द्यावी. ठिबक सिंचन योजना शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला आधारभूत किंमत द्यावी. गंगा कल्याण योजना सर्व शेतकऱ्यांना देण्यात याव्यात. यासह इतर मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले.
यावेळी बसवराज मोकाशी, रवी पाटील, चन्नाप्पा गणाचारी, प्रसाद कुलकर्णी, कल्लाप्पा हरियाल, मल्लिकार्जुन झुटनावर, राजू नाईक, इरप्पा मुल्लाणी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.