पैकुळ ग्रामस्थांची मागणीः गैरसोय होण्याची शक्यता
उदय सावंत /पैकुळ
सत्तरी तालुक्मयात गेल्या वषी 23 जुलै रोजी आलेल्या महापुरामुळे पैकुळ येथील पूल वाहून गेला होता. यामुळे पैकुळवासियांची मोठय़ा प्रमाणात गैरसोय झाली होती. एक वर्षात पुलाची उभारणी करून लोकांची अडचण दूर करणार असे आश्वासन सरकारतर्फे देण्यात आले होते. पैकुळ नदीवर बांधण्यात येत असलेल्या पुलाचे काम 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. सदर पुलाचे काम 15 जून पूर्वी पूर्ण करा अशी मागणी पैकुळ ग्रामस्थांनी केली आहे.
पावसाला अवघेच दिवस शिल्लक असल्यामुळे पावसाळय़ापूर्वी हा पूल पूर्ण होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे यंदा पावसातही लोकांची मोठय़ा प्रमाणात गैरसोय होणार असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे सदर पुलाचे बांधकाम 15 जून पूर्वी कोणत्याही परिस्थितीत सरकारने पूर्ण करावे, अशी ग्रामस्थ व खासकरून विद्यार्थी करत आहेत.
सत्तरीत आलेल्या महापुराचा फटका पैकुळ पुलाला बसला होता. पूल वाहून गेल्यामुळे पैकुळ भागातील लोकांची अडचण निर्माण झाली होती. सरकारने पर्यायी व्यवस्था म्हणून धारबांदोडा भागातील बोंडला मार्गे रस्त्याची सुविधा निर्माण केली होती. सध्या हा रस्ता खराब झाला आहे. या रस्त्यावरून चालत जाणे अशक्मय बनले आहे. सध्या बांधकाम सुरू असलेल्या पुल पूर्ण होणे कठीण आहे. यामुळे यंदाच्या पावसात लोकांची डोकेदुखी वाढणार असल्याचे दिसून येत आहे.
पुलाचे बांधकाम 80 टक्के पूर्ण
गोवा सरकारने सदर पुलाचे बांधकाम एक वर्षापूर्वी करण्याचे आश्वासन दिले होते. सध्या ज्या पद्धतीने काम सुरू आहे ते पाहिल्यास पावसाळय़ापूर्वी काम पूर्ण होणे कठीण आहे. जवळपास 80 टक्के काम पूर्ण झाल्याचे निदर्शनास येत आहे.
प्राप्त माहितीनुसार सध्या सरकारने बोंडला मार्गे या गावात रहदारीची सुविधा केली आहे. सदर रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. आपत्कालीन व्यवस्थे संदर्भात जिल्हाधिकाऱयांनी याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे होते मात्र रस्त्याची अजून डागडूजी केलेली नाही. पावसाळयात सदर रस्ता वाहतुकीसाठी उपलब्ध असला तरी त्यावरू प्रवास करणे धोक्याचे असून सरकार तसेच आमदार विश्वजित राणे यांनी याप्रकरणी लक्ष घालणे आवशक असल्याचे ग्रामस्थ अजित देसाई यांनी सांगितले.
सदर पूल वर्षभरात पूर्ण करणचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र त्यासंदर्भात कामाला गती प्राप्त झालेले नाही. यामुळे पावसापूर्वी हा पूल वाहतुकीस उपलब्ध होणे कठीण आहे. यामुळे सरकारने या संदर्भात विशेष लक्ष देण्याची मागणी विद्यार्थ्यांच्यावतीने मुग्धा देसाई हिने केली आहे.
तात्पुरता पदपूल अपुरा
पैकुळ व गुळेली या दरम्यान जलसिंचन खात्यातर्फे तात्पुरती पायवाट व्यवस्था केलेली आहे. मात्र नदीमध्ये यंदाच्या पावसात पाण्याची पातळी वाढल्यास हा पदपूल लोकांच्या सोयीसाठी अपुरा पडण्याची भीती व्यक्त होत आहे. खास करून विद्यार्थ्यांना याचा फ्ढटका बसणार आहे.