सदानंद तानावडे यांची प्रतिक्रिया
पणजी : यंदाचा अर्थसंकल्प सर्वस्पर्शी आहे. समाजातील प्रत्येक घटकाला त्यातून काही ना काही मिळाले आहे, हेच या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्या आहे, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी व्यक्त केले आहे. अर्थसंकल्प तयार करण्यापूर्वी मुख्यमंत्री सावंत यांनी सर्व क्षेत्रातील भागिदारांशी चर्चा करून त्यांच्या समस्या, मागण्या जाणून घेतल्या व सर्व क्षेत्रतील लोकांना फायदा व्हावा हा हेतू समोर ठेवूनच अर्थसंकल्पात योग्य त्या तरतुदी केल्या असल्याचे तानावडे म्हणाले. ज्यांनी वेळेत कर भरला नाही त्यांच्यासाठी एकरकमी परतफेड योजना जाहीर केली आहे. त्यामुळे सर्वांना कर भरण्याची संधी मिळणार आहे. एकंदरीत अर्थसंकल्प पाहिल्यास समाजातील सर्व घटकांचा विकास करण्याचा दृष्टीकोन समोर ठेवल्याचे दिसत आहे. सोबतच सरकारने केंद्र सरकारच्या योजनांचा सर्वाधिक लाभ घेण्यासाठी विशेष नियोजन केल्याने केंद्र सरकारकडूनही मोठ्या प्रमाणात आर्थिक सहकार्य राज्य सरकारला मिळणार आहे, असे तानावडे यांनी पुढे सांगितले.