प्रतिनिधी /बेळगाव
एसकेई सोसायटीच्या आरपीडी कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सात दिवसांच्या सेवा शिबिराची सांगता किणये गावात झाली. या शिबिरादरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
दररोज ध्वजारोहण, एनएसएस गीत गायन सादर करण्यात आले. मराठी विद्या मंदिर व सरस्वती माध्यमिक हायस्कूल येथे विद्यार्थ्यांनी श्रमदान करून स्वच्छता अभियान राबविले. वृक्षारोपण करून लावलेल्या वृक्षांना पाणी घातले. दररोज गावामध्ये जागृती रॅली काढण्यात येत होती. शिबिराचे उद्घाटन कॉलेजच्या प्राचार्या डॉ. शोभा नाईक, किणये गावचे शिक्षण सुधारणा कमिटी चेअरमन प्रभाकर डुकरे, ग्रा. पं. उपाध्यक्ष मल्लाप्पा पाटील, कॉलेजचे माजी विद्यार्थी मनोज बिर्जे यांच्या हस्ते करण्यात आले.
आजादी का अमृतमहोत्सव या विषयावर डॉ. चंद्रशेखर मुन्नोळी, शरीर व स्वास्थ्य या विषयावर डॉ. कृष्णा गुमास्ते, सेंद्रीय शेती व त्यामध्ये युवकांचा समावेश या विषयावर शिवाजी कागणीकर व पिराजी माहुत, युवकांवरील सामाजिक जबाबदारी या विषयावर डॉ. हरिष कोलकार, राष्ट्र उभारणी व ग्राम उभारणीमध्ये युवकांचे योगदान या विषयांवर लिंगराज कॉलेजचे डॉ. एच. एम. चन्नप्पगोळ यांची व्याख्याने झाली.
शिबिराचे संयोजन एनएसएस अधिकारी डॉ. रामकृष्ण एन., प्रा. भारती अध्यापक, एनएसएस प्रतिनिधी कीर्ती रेवणकर यांनी केले होते. सांगता समारंभाला डॉ. एन. जी. बुजुर्गी उपस्थित होते. ग्रा. पं. सदस्या विद्या डुकरे, मनोज बिर्जे यांचे सहकार्य मिळाले. या शिबिरात 50 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.