‘वयोवृद्ध आईवडिलांना घराबाहेर काढले’ या प्रकारच्या बातम्या क्वचितच वाचायला मिळतात. पण वृद्ध आईवडिलांची हेळसांड होते, त्यांच्याकडे म्हणावे तसे लक्ष दिले जात नाही, त्यांना पूर्वीसारखा मानही दिला जात नाही हे चित्र सर्वत्र पहायला मिळते. बहुतेक कुटुंबातून वृद्ध सदस्यांची ही स्थिती आहे. कोणी म्हाताऱया आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवतात, कोणी गांवी राहिलेल्या आईबापांकडे ढुंकूनही बघत नाहीत, अन्यत्र फालतू गोष्टींवर हवा तेवढा खर्च करणारे वृद्ध आईच्या औषधोपचाराचा किंवा वडिलांच्या चष्म्याच्या दुरुस्तीचा प्रश्न आला की भलतेच हिशेबी बनतात. कोणी लग्नानंतर वेगळे बिऱहाड थाटल्यावर मागे वळूनसुद्धा बघत नाहीत, तर कोणी करिअरच्या नावाखाली परदेशात गेल्यावर मायभूमीत राहणाऱया आईवडिलांना पारच विसरून जातात.
अशी ही वृद्धांची अवस्था, हा काही अपरिचित विषय राहिला नाही. पण यावर विशेष लिहावेसे वाटण्याचे कारण म्हणजे ‘संयुक्त राष्ट्र संघटने’च्या मानवाधिकार विभागाच्या प्रमुख मिशेली बॅचलेट यांनी अलीकडेच केलेले प्रतिपादन. ‘वृद्धांबाबत होणारा भेदभाव’ यावर प्रकाश टाकणारा एक अहवाल त्यांच्या नेतृत्वाखाली गेल्याच महिन्यात मानवाधिकार समितीला सादर करण्यात आला. तीनच दिवसांपूर्वी त्यांचे ‘वृद्धपणा’ या विषयासंबंधी कार्य करणाऱया एका कार्यगटापुढे भाषण झाले त्यात बोलताना, वृद्धांची अवस्था समाधानकारक नाही हे त्यात अधोरेखित करण्यात आले.
आजवर कधी नव्हे इतकी वृद्धांची काळजी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे, असे त्या म्हणाल्या. गेली अकरा वर्षे याबद्दल काम करताना केलेल्या निरीक्षणातून काढलेल्या आपल्या निष्कर्षाची मांडणी मिशेली बाईंनी केली आणि तो निष्कर्ष क्लेशदायक आणि तितकाच धक्कादायकही आहे, असे ‘युनो’ने प्रसृत केलेल्या वार्तापत्रावरून दिसते.
मिशेली बाई म्हणाल्या, की भेदभाव नसलेल्या सुरक्षित वातावरणात जगण्याची प्रत्येक व्यक्तीला संधी मिळाली पाहिजे या कल्पनेची पूर्तता करणाऱया आंतरराष्ट्रीय कायद्याच्या चौकटीतील सक्षम तरतुदींचा लाभ वृद्धांच्या वाटय़ाला आल्याचे फारसे दिसत नाही. हे बोलताना त्यांची भाषा आणि मांडणी सकारात्मक होती. ‘कोठेही गेले तरी वृद्ध व्यक्ती सन्मानाने जीवन कंठत आहेत आणि त्यांना पुरेशी आर्थिक सुरक्षा लाभलेली आहे, असे जग पहायला मला आवडेल,’ असे त्या म्हणाल्या. त्याचवेळी, ‘असे चित्र निर्माण होण्याच्या शक्मयतेपासून आपण पुष्कळ दूर आहोत,’ अशा शब्दांत त्यांनी स्पष्टपणे वास्तवाची जाणीवही करून दिली.
सध्या अस्तित्वात असलेल्या कायदेशीर तरतुदी वृद्धांना पुरेसे संरक्षक वातावरण देऊ शकत नाहीत, हा मिशेली बाईंच्या भाषणाचा सारांश होता. गेली दोन वर्षे जगाला ग्रासून राहिलेल्या ‘कोविड-19’च्या महामारीने साठ लाख बळी घेतले आणि त्यांत वृद्धांचे प्रमाण अधिक होते, हे सांगून त्यांनी स्पष्ट केले की, मानवाधिकार अबाधित ठेवण्यासंबंधी वातावरण वृद्धांच्या वाटणीला फारसे आलेच नाही, हे या महामारीच्या निमित्ताने उघड झाले.
वाढत्या वयाबरोबर रुंदावत जाणारी भेदांची दरी वृद्धांना दारिद्रय़ाकडे नेते, आणि सुविधांपासून वंचित ठेवते हे त्यांनी अधोरेखित केले. वृद्ध माणसे समाजात एकाकी पडत चालली आहेत. वास्तविक आयुष्याच्या ज्या टप्प्यावर त्यांना ही सामाजिक सुरक्षा मिळायला पाहिजे ती मिळत नाही. यातच ‘हवामान बदल’ या संकटाने भर घातल्याचेही मिशेली यांच्या बोलण्यातून आले. आरोग्याच्या तक्रारी, अन्नाचा तुटवडा, पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य, राहण्यास चांगल्या जागेची कमतरता आणि स्वच्छतेच्या सुविधांची उणीव या समस्या वृद्धांच्या जगण्याचा प्रश्न आणखी बिकट बनवत आहेत.
मिशेली बॅचलेट यांच्या शब्दांत सांगायचे तर ‘ज्ये÷ांच्या कल्याणाची संकल्पनाच धोक्मयात आली आहे.
वृद्ध महिलांच्या बाबतीत होणारा हिंसाचार वाढला आहे. मध्यंतरी आपण औषधे नेणारे ट्रक अडकून पडलेल्या इथिओपियामधील इरिट्रिया प्रांताची माहिती मिळविली. त्याचा उल्लेख करून श्रीमती मिशेली म्हणाल्या की वृद्ध महिलांना औषधे मिळेनाशी झालीत, मानसिक ताण वाढलाय आणि भावनिक दिलासाही मिळेनासा झाला आहे.
कित्येक वर्षांच्या युद्धपरिस्थितीमुळे कोलमडलेल्या आरोग्य सेवेची मोठी झळ सीरियासारख्या देशांतील ज्ये÷ांना पोहोचली आहे. युद्धस्थितीबद्दल बोलताना त्यांनी युपेनमध्ये सुरू असलेल्या लढाईमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवरही भाष्य केले. ‘तिथे तर वृद्धांची अवस्था दयनीय झाली आहे,’ श्रीमती मिशेली म्हणाल्या, ‘कित्येक दिवसांची उपासमार, औषधांचा तुटवडा, पाण्याचे दुर्भिक्ष्य आणि त्या बर्फाळ देशात निर्वासित झालेल्या वृद्धांना शेकोटीची ऊबही नीट मिळेनाशी झाली आहे! दुखण्यांनी बेजार झालेली माणसे आधीच दुसऱयावर अवलंबून असतात, बॉम्बच्या माऱयापासून सुरक्षित राहण्यासाठी कुठेतरी चांगला आश्रय मिळविणे त्यांना कठीण होऊन बसले आहे.’
वृद्धांसाठी एकूणच परिस्थिती बिकट आहे, त्यांना सुविधा पुरविण्याच्या व्यवस्था सक्षम नाहीत. इसवी सन 2050 पर्यंत जगातील वृद्धांची संख्या वाढून 15 ते 24 वर्षे वयोगटातील तरुणांपेक्षा त्यांचे प्रमाण अधिक होईल. या लोकांसाठी आपण कोणती परिस्थिती देणार आहोत? असा अंतर्मुख करणारा प्रश्न विचारणाऱया श्रीमती मिशेली यांनी या अहवालाच्या आणि भाषणाच्या निमित्ताने आणखी एक गंभीर वास्तव जगासमोर आणले. आजपर्यंत ‘मानवाधिकारा’ संबंधीच्या एकही ठरावात वृद्धांसाठी खास तरतूद करण्यात आली नाही, हे ते वास्तव. एका अर्थी ते ‘युनो’च्याच बोलघेवडेपणावर बोट ठेवते.
सजीवांच्या आयुष्यात अटळ ठरणाऱया वृद्धत्वाच्या टप्प्यावर, आवश्यक सुविधांच्या अभावापोटी त्यांच्या आयुष्याची संध्याकाळ सुखद कशी होणार हा प्रश्न त्यांनी विचारला आहे आणि हे व्हायला नको म्हणून ज्ये÷ांच्या आणि तरुणांच्या पिढय़ांतील अंतर कमी करून ‘जनरेशन गॅप’ची जागा ‘दोन पिढय़ांतील मैत्री’ने घेतली पाहिजे हा उपाय त्यांना प्रभावी वाटत आहे.
राजेंद्रप्रसाद स. मसुरकर