पणजी : एक प्रभावी सागरी पुरवठा साखळी विकसित करण्यासाठी आदर्श असलेली 7500 कि.मी.ची प्रचंड लांबीची किनारपट्टी आणि सागरी उद्योगाला अनुरूप अशा नद्या भारताला लाभलेल्या असून या सुविधा अद्याप अस्पर्शीत आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री. श्रीपाद नाईक यांनी केले.
सागरी सार्वजनिक – खाजगी भागीदारी परिषदचे आज मुंबईत उद्घाटन केल्यानंतर केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग तथा पर्यटन राज्य मंत्री श्री. श्रीपाद नाईक बोलत होते.
पीपीपी अर्थात सार्वजनिक खाजगी भागीदारी पद्धत आज पायाभूत विकासासाठी परिपूर्ण बनली आहे, असे श्री. नाईक पुढे म्हणाले.
कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढीसाठी आणि वाढत्या स्पर्धेचा विचार करता सार्वजनिक – खाजगी भागीदारी फार उपयुक्त पद्धत ठरली आहे, असे श्री. नाईक यांनी पुढे नमूद केले.
भारतीय बंदर क्षेत्रात सार्वजनिक-खाजगी भागीदारीतील गुंतवणुकीच्या यशाची 25 वर्षें साजरी करीत असताना सार्वजनिक-खाजगी भागीदारी पद्धती अधिक मजबूत करण्याची गरज आहे, असे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक म्हणाले. दोन दिवस चालणाऱया परिषदेत सागरी उद्योगाशी निगडीत अनेक चर्चासत्रे?, परिसंवादांचे आयोजन करण्यात आले आहे.