प्रतिनिधी /पणजी
विरोधकांच्या सतावणूक प्रकरणा विरोधात काँग्रेस पक्षाच्या गोवा विभागाने काल पाटो येथे निषेध मोर्चा काढला. विराधकांचा आवाज बंद करण्यासाठी सरकारी यंत्रणेचा वापर केला जात आहे. विरोधी पक्षातील आमदारांना व खासदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली जात आहे. काँग्रेस पक्ष सरकारच्या या कारस्थानचा निधेष करीत आहे. राहुल गांधी तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.
यावेळी विरेधी पक्ष नेते मायकल लोबो, शिवोलीच्या आमदार दिलायेला लोबो, वरद म्हर्दोळकर, जर्नादन भंडारी, दक्षिण गोवा खासदार फ्रान्सिस सार्दिन, महिला अध्यक्षा बिना नाईक, प्रदेशाध्यक्ष अमीत पाटकर, तसेच सुमारे 70 कार्यकर्ते उपस्थित होते. मोर्चा सकाळी 11.15 च्या सुमारास सुरु झाला होता.
यावेळी पत्रकारांशी बोलताना अमीत पाटकर म्हणाले की राष्ट्रीय हेराल्ड बाबतची तक्रार 2015 सालात बंद झाली असतानाही राहुल गांधी व श्रीमती सोनीया गांधी यांना आता कारणे दाखवा नोटीस बजावली जात आहे. सरकार केवळ विरोधकांची सतावणूक करण्याचा आणि विरोधकांच्या मनात भिती निर्माण करण्याचा प्रय़त्न करीत आहे.
राज्यात तसेच देशात सर्वसामान्य जनतेला सतावणारे अनेक प्रश्न आहेत ते सोडविण्यात सरकार अपयशी ठरले असताना आपले अपयश लपविण्यासाठी विरोधकांना नोटीसी बजावल्या जात आहेत. देशाची आर्थिक स्थिती बिघडत चालली आहे, बेकारी दिवसेंन दिवस वाढत आहे. महागाई गगनाला भिडली आहे. याच्याकडे सरकारचे लक्ष नाही. जनतेची दिशाभूल करण्यासाठी सरकार नकोत्या भानगडी करण्यात व्यस्त आहे असेही पाटकर यांनी सांगितले.
मंत्री विश्वजीत राणे यांची स्मरणशक्ती कमी झाली आहे. त्यामुळे ते मायकल लोबो कोण असा प्रश्न पत्रकारांना करीत आहेत. एका बाजूने ते म्हणतात की अमीत पाटकर कोण तर दुसऱयाबाजून माझी गाडी कसली आणि आपला व्यवसाय कोणता हेही तेच सांगतात याचा अर्थ विश्वती राणे यांनी सध्या मॅडीटेशन करणे जरूरीचे आहे. अन्यथा त्यांनी राजीनामा द्यावा आणि थोडे दिवस शांत घरी बसावे असा सल्ला पाटकर यांनी दिला. वास्तविक मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या गोष्टीत लक्ष घालणे फार महत्वाचे आहे. बेलगाम सुटलेल्या या मंत्र्याला वेळीच आळा घाला अशी मागणी पाटकर यांनी केली आहे.