काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
प्रतिनिधी /बेळगाव
भाजपने ईडी याचबरोबर इतर संस्थांना ताब्यात घेऊन त्यांची भीती विरोधी पक्षांना व इतर आमदारांना दाखवून सत्ता ताब्यात घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करत असून अच्छे दिन आणणाऱ्या सरकारने साऱ्यांना बुरे दिन आणून ठेवले आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत काँग्रेस सत्तेवर येईल आणि सर्व जनतेला अच्छे दिन येतील असे काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितले. भाजपच्या कृत्याचा जाहीर निषेध नोंदवत असल्याचेही त्यांनी म्हटले.
यावेळी माजी मंत्री एम. बी. पाटील, आमदार अंजली निंबाळकर, माजी आमदार फिरोज सेठ, मृणाल हेबाळकर, यांच्यासह काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.