ऑनलाईन टीम/तरुण भारत
अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाल्यापासून कॉंग्रेसमधील (Congress) अंतर्गद वाद चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेसचे अनेक नेते अध्यक्ष पदावरून थेट गांधीघराण्यावर टीका करत आहेत. यातच महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Former CM Maharashtra Prithviraj Chavan) यांनी पक्षाला पार्ट टाईम नाही तर फुल टाईम अध्यक्ष देण्याचा मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. पक्षाच्या नव्या अध्यक्षाला सर्वांना भेटण्यासाठी भरपूर वेळ असायला हवा, त्याच्यावर दुसरी कोणतीही जबाबदारी द्यायला नको, असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे.
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत G-२३ गटाकडून खासदार शशी थरुर (Shashi Tharoor) आणि गांधी गटाकडून राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांचे नाव जवळपास निश्चीत झालं असल्याची माहिती आहे. याबाबत बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष मिळायला हवा ही आमची प्रमुख मागणी असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. या सोबत याशिवाय अध्यक्षपदाच्या निवडणुका पारदर्शीपणे पार पडायला हव्यात, अशीही मागणी आम्ही शीर्ष नेत्यांकडे केली आहे. दरम्यान अशोक गेहलोत हे सध्या राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदावर आहेत. त्यामुळे पदावर असताना ते अध्यक्षपद स्विकारत असतील तर त्याला आमचा विरोध आहे. आम्हाला हे बिलकूल चालणार नाही. पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष हवा, असे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
हे ही वाचा : चाईल्ड पोर्नोग्राफीप्रकरणी महाराष्ट्रासह 20 राज्यात CBI चे छापे
कॉंग्रेसच्या त्या ठरावावरही टीका…
मुंबई कॉंग्रेस कमिटीनं पक्षाच्या अध्यक्षपदासाठी राहुल गांधींना पाठिंबा देण्यासाठी एक ठराव पास केला होता. त्याला पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोध केला आहे. ते म्हणाले की, मुंबईत पक्षानं ठराव पास करण्याची काहीच आवश्यकता नव्हती. पक्षांतर्गत सर्व पदांवर निवडणुका व्हायला हव्यात. असे ठराव कोण पास करतंय?, असा सवाल करत त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर (Nana patole) टीका केली आहे.