ऑनलाईन टीम/तरुण भारत
सुमारे ७० वर्षांपूर्वी नामशेष झालेले नंतर नामिबियन चित्ते आज पुन्हा भारतात आलेत. प्रोजेक्ट चीता अंतर्गत हे आठ चित्ते आणले जात आहेत. यात पाच मादी आणि तीन नर चित्ते आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हे चित्ते खास बांधण्यात आलेल्या उद्यानात सोडले आहेत. मात्र, आता या चित्त्यावरून राजकारण सुरू झालं आहे. हे चित्ते काँग्रेसच्या प्रयत्नांमुळंच भारतात येत असल्याचा दावा काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केला असून त्यांनी ट्वीट करत संपूर्ण घटनाक्रमच सांगितला आहे.
डॉ. मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांच्या नेतृत्वाखाली यूपीए सरकारने आफ्रिकेतून चित्ते आणण्यासाठी प्रोजेक्ट चीताची सुरुवात केली. तत्कालीन वने आणि पर्यावरण मंत्री जयराम रमेश (jairam ramesh) यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आता चित्ते भारतात येत आहेत ही आनंदाची बाब आहे, असं ट्वीट बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे.


दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी या संदर्भात हे लेख लिहिला आहे. त्यानंतर राज्या-राज्यातील काँग्रेस नेते ‘प्रोजेक्ट चित्ता’ विषयीचा घटनाक्रम उलगडून सांगत आहेत. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही काँग्रेसच्या प्रयत्नांची माहिती देणारं ट्वीट केलं आहे.
हे ही वाचा : सात दशकानंतर भारतात परतला चित्ता
प्रोजेक्ट चीताचा प्रस्ताव २००८-०९ मध्ये तयार झाला होता. तत्कालीन मनमोहन सिंग सरकारने त्याला मान्यता दिली. एप्रिल २०१० मध्ये तत्कालीन वन आणि पर्यावरण मंत्री जयराम रमेश आफ्रिकेतील चीता आउटरीच सेंटरमध्ये गेले. पण २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयानं प्रकल्पाला स्थगिती दिली. २०२० मध्ये कोर्टाने स्थगिती उठवली. आता चित्ते आणले जात आहेत, असं थोरात म्हणाले. तसेच थोरातांनी जयराम रमेश यांचा त्या वेळचा चित्त्यांसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. हे चित्ते भारतात येत असल्याबद्दल त्यांनी आनंदही व्यक्त केला आहे.