खानापुरात ब्लॉक काँग्रेस मेळाव्यात सतीश जारकीहोळी यांचे प्रतिपादन : अनेक पं. सदस्यांसह कार्यकर्त्यांचा पक्षात प्रवेश
वार्ताहर /खानापूर
देशाच्या निर्मितीत काँग्रेसचे मोठे योगदान आहे. स्वातंत्र्यनंतरच्या काळातही काँग्रेस पक्षाने देशातील सर्वसामान्य जनतेला न्याय व सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. जात-पात भेदभाव सोडून काँग्रेसने सर्व समावेशक विकासाची योजना अनेकवेळा आखली. पण आता भाजपवाले भाषेचे राजकारण करत सर्वसामान्यांची दिशाभूल करत आहेत. महागाईत होरपळून गेलेल्या लोकांना आता पुन्हा काँग्रेस पक्षाची जाणीव होऊ लागली आहे. त्यामुळे ‘काँग्रेस जोडो अभियानात’ आगामी काळात सर्व लोक काँग्रेसमध्ये समाविष्ट होतील. त्यामुळे येत्या 2023 च्या विधानसभा निवडणुकीत कर्नाटकात पुन्हा काँग्रेसची सत्ता येणार यात शंका नाही असे विचार राज्य प्रदेश काँग्रेसचे वरि÷ नेते माजी मंत्री आमदार सतीश जारकीहोळी यांनी खानापूर येथील शुभम गार्डनमध्ये आयोजित काँग्रेस मेळाव्यात व्यक्त केले. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. अंजली निंबाळकर होत्या.
सतीश जारकीहोळी पुढे म्हणाले, खानापूर तालुक्मयात काँग्रेसला नेतृत्व दिल्यानंतर तालुक्मयाचा विकास साधण्यासाठी डॉ. अंजली निंबाळकर यांनी हाती घेतलेल्या लोकोपयोगी कामामुळे कार्यकर्त्यांत नवचैतन्य निर्माण झाले आहे. त्यामुळे भाषा, भेद-भाव बाजूला ठेवून अनेक महिलासह पुरुष मंडळी तसेच अनेक ग्रामपंचायत सदस्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करणे म्हणजे ही पक्षाची मोठी ताकद आहे. अशाच प्रकारे येत्या निवडणुकीतही तालुक्मयातील जनतेने काँग्रेसच्या पाठीशी राहावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी तालुक्मयातील ग्रामपंचायतीच्या शेकडो सदस्य तसेच विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी सतीश जारकी होळी व आमदार निंबाळकर यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामध्ये प्रामुख्याने महिलांचा समावेश अधिक आहे.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना आमदार डॉ अंजली निंबाळकर म्हणाल्या, गेल्या साठ वर्षात काँग्रेसने काय केले म्हणणाऱया भाजप सरकारने काँग्रेसच्या विकासकामांचा पाढा समोर ठेवावा, काँग्रेसच्या काळात मार्गी लावलेल्या योजना आजही सर्वसामान्य लोकांपर्यंत कार्यरत आहेत. असे असताना आपणच केल्याचा आव भाजपवाल्यांनी आणू नये, देशात वाढलेली महागाई यामुळे जनता मेटाकुटीस आली आहे. कर्नाटकात भाजप सरकार कुचकामी व भ्रष्ट ठरले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच सत्तेवर येणार यात शंका नाही.
व्यासपीठावर काँग्रेस नेते रियाज पटेल, नंदगड ग्रामपंचायतीचे माजी सदस्य महांतेश राऊत, गौसलाल पटेल, नगरसेवक लक्ष्मण मादार, विजय सानिकोप, चंबांना होसमणी, अशोक अंगडी, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष महादेव कोळी, ग्रामीण अध्यक्ष मधु कवळेकर, मंगेश गुरवसह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
व्यासपीठावरून जयराज चापगावकर, महांतेश राऊत, तमान्ना कोलकार, चंबाना होसमनी, लक्ष्मण मादार, आर. एम. तुमकूर आदींची भाषणे झाली. मेळाव्याला खानापूर तालुक्मयातील अनेक ग्रामपंचायतीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य तसेच अनेक ज्ये÷ नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.