तरुणभारत ऑनलाइन टीम
आजच्या धावपळीच्या जगात बहुतांश लोक नाश्ता करत नाहीत याउलट ते फास्टफुडलाच पसंती देतात.आठवड्यातून एकदा तरी चमचमीत पदार्थ खाल्लाच जातो.पण पिझ्झा, फ्रेंच फ्राईज, बर्गर, समोसा यांसारख्या ट्रांसफॅट, सॅच्यूरेटेड फॅट्स असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उदभवू शकतात.यात फायबर्स, मिनरल्स, व्हिटामीन्सचे प्रमाण भरपूर असते. यामुळे वजन तर वाढतेच पण कॉलेस्ट्रॉल, ब्लड प्रेशर वाढण्याचा धोकाही संभवतो. अनेकदा हृदयाच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होऊ शकतो.
जंकफूड किंवा जास्त प्रमाणात तळलेले पदार्थ खाल्ल्यामुळे पोटदुखी, सूज येणे, अतिसार यासारखे दुष्परिणामही दिसू शकतात.त्यामुळे हे पदार्थ जास्त प्रमाणात खाणे टाळलं पाहिजे. बऱ्याचवेळा तळलेले अन्न खाल्ल्यानंतर थंड पदार्थांचे सेवन केले जाते. मात्र आईस्क्रीम सारखे पदार्थ खाल्ल्याने यकृत, पोट आणि आतड्यांचे नुकसान होते. याशिवाय तेलकट भोजन पचविणे अवघड असते. यामुळे थंड अन्न पचविणे अधिक कठीण होते. अन्न पचवता न आल्यामुळे बर्याच वेळा फुगवटा जाणवतो.शिवाय तेलकट पदार्थांच्या अतिसेवनामुळे अपचनाचा त्रास देखील होतो. त्यामुळे आहारात तेलकट पदार्थांचे सेवन कमी प्रमाणात करायला हवे.आहारतज्ज्ञांनुसार दिवसाची सुरुवात करतांना तेलकट किंवा तळलेले पदार्थ खाणे तब्येतीसाठी हानिकारक आहे.