स्मशानभूमींमध्ये मृतदेहांचा खच, नागरीक चिंतेत
@ बीजिंग / वृत्तसंस्था
चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाला असून त्यात अनेक नागरीकांचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त आहे. अनेक शहरांमधील स्मशानभूमींमध्ये अंत्यसंस्कारासाठी मोठय़ा संख्येने मृतदेह आल्याने प्रशासनावर ताण पडत असून कर्मचाऱयांची संख्याही अपुरी ठरत आहे. नागरीकांमध्ये घबराट पसरली आहे.
काही दिवसांपूर्वी चीनने त्याच्या ‘शून्य कोरोना’ धोरणाला मुरड घालत बहुतेक सगळे निर्बंध शिथील केले होते. या निर्बंधांविरोधात प्रचंड आंदोलने झाली होती. नागरीकांनी लक्षावधीच्या संख्येने रस्त्यावर उतरुन अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या निर्बंध धोरणाला विरोध केला होता. त्यामुळे तेथील प्रशासनाने अनेक निर्बंध हटविण्याचा निर्णय घेतला होता. निर्बंध हटविल्यापासून तेथे पुन्हा कोरोनाचा प्रचंड उद्रेक झाला आहे. अनेक विदेशी पत्रकारांनी याचे वृत्तांकन केले आहे.
आकडा लपविल्याचा आरोप
कोरोनाच्या नव्या उद्रेकाची तीव्रता जगापासून लपविण्याचा प्रयत्न चीन करीत आहे, असा आरोप अमेरिकेसह अनेक पाश्चिमात्य देशांनी केला आहे. मृतांचा आकडाही लपविला जात आहे. प्रशासनाच्या पोलादी पडद्याआड काय घडत आहे याची कल्पना जगाला येऊ नये याची दक्षता घेतली जात आहे. मात्र, तरीही माहिती बाहेर पडत असून ती धक्कादायक असल्याचे स्पष्ट केले जात आहे. मृतांची अधिकृत संख्या अद्याप सांगण्यात आलेली नाही.
यंदाचा हिंवाळा जीवघेणा
चीनसाठी यंदाचा हिंवाळा जीवघेणा ठरेल असे मत पाश्चिमात्य तज्ञांनी व्यक्त केले. या हिंवाळय़ात कोरोनाचे किमान तीन घातक उद्रेक होण्याची शक्यता आहे. या उद्रेकांमध्ये 10 लाखांहून अधिक नागरीक प्राणास मुकतील असेही अनुमान काढण्यात आले आहे. चीनचे शून्य कोरोना धोरण अपयशी ठरत आहे. निर्बंध असूनही कोरोनाचा फैलाव झपाटय़ाने होत आहे. लसीकरण झालेले नागरीकही नव्या कोरोना उद्रेकाला बळी पडत असल्याची माहिती देण्यात आली.
प्रशासनाचे मौन
नेमकी परिस्थिती काय आहे, याची माहिती प्रशासनाकडून अधिकृतरित्या मिळत नसल्याने चीनमधील नागरीकही चिंताग्रस्त झाल्याची वृत्ते पाश्चिमात्य माध्यमांमध्ये झळकत आहेत. चीनी प्रशासनाने या वृत्तांचा इन्कारही केलेला नाही. प्रशासनाकडून शक्य तितके प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले जात असले तरी नागरीकांचा त्यावर विश्वास नाही. त्यामुळे प्रशासनविरोधी भावना वाढीस लागली आहे. चीनमध्ये नागरीकांचा आवाज दाबला जात असल्याची टीका केली जात आहे.
भारताकडून समिती स्थापन
चीनमध्ये झालेला कोरोनाचा उद्रेक पाहता भारतात केंद्र सरकारने एका विशेष समितीची स्थापना केली आहे. त्वरित स्थापन झालेली ही समिती विदेशातून, विशेषतः चीनमधून येणाऱया प्रवाशांवर किंवा इतर देशांमधून येणाऱया चीनी प्रवाशांवर लक्ष ठेवणार आहे, अशी अनधिकृत माहिती सूत्रांनी दिली. मात्र, अशी अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. चीनमधील परिस्थिती गंभीर असली तरी भारतात आताच चिंता करण्याचे काहीही कारण नाही. सरकार स्थितीवर लक्ष ठेवून असून योग्य वेळी योग्य पावले उचलली जातील. नागरीकांना अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घाबरून जाऊन नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
चीनची पुन्हा अग्नीपरीक्षा
ड चीनमध्ये पुन्हा उसळलेल्या कोरोनात हजारो लोक मृत्यूमुखी ?=
ड कोरोनाच्या कारणास्तव घातलेले बहुसंख्या निर्बंध आता रद्द
ड कोरोनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या अग्निसंस्कारांना जागा अपुरी ड भारताकडून दक्षता समिती स्थापन, स्थिती पाहून निर्णय घेणा