ऑनलाईन टीम/तरुण भारत
मुंबई: भाजपने जितेंन्द्र आव्हाड, यशोमती ठाकूर, सुहास कांदे यांनी नियमबाह्य मतदान केल्याचा आरोप करत मते बाद करावीत अशी मागणी भाजपच्या निवडणूक अधिकारी योगेश सागर आणि अतुल सावे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केलीयं. नियमबाह्य मतदानाच्या आक्षेपावर केंद्रीय निवडणूक आयोग जोपर्यंत निर्णय देत नाही तोपर्यंत मतमोजणी सुरू होणार नाही. अशी भूमिका त्यांनी घेतल्याने राज्यसभेच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू होण्यास विलंब लागणार आहे.
आज सकाळपासूनच राज्यसभेच्या ६ व्या जागेसाठी अटीतटीची लढत झाली. भाजपने मतदानामध्ये आभेप घेताच काॅंग्रेसच्या अमर राजूरकर यांनी सुधीर मुनगंटीवारांच्या मतदानावर आक्षेप घेतला आहे. मुनगंटीवार यांनी मतपत्रिका चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हातात दिल्याने काॅंग्रेसने हरकत घेतली आहे. यामुळे विधानसभेत काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र निवडणूक आयोगोने भाजपचे अपील फेटाळले. दरम्यान काॅंग्रेसने केलेल्या आरोपाने निवडणूक आयोग काय भुमिका घेणार हे पाहावे लागणार आहे.
दरम्यान आज ५ वाजता मतमोजणी सुरु होऊन ७ पर्यंत निकाल लागणार होता. मात्र भाजपच्या या मागणीने मतमोजणी सुरु होण्यास विलंब लागणार असून निकाल लागण्यास ही वेळ लागणार आहे.