प्रतिनिधी /बेळगाव
न्यायालयांना 23 एप्रिलपासून उन्हाळी सुटी होती. त्यामुळे महिनाभर न्यायालय परिसरात शुकशुकाट पसरला होता. केवळ महत्त्वाचे खटले वगळता इतर कोणतेही खटल्याचे कामकाज सुरू नव्हते. वकिलांनीही न्यायालयाला सुटी असल्याने विश्रांती घेण्यावरच भर दिला होता. मात्र आता सोमवार दि. 23 पासून न्यायालये सुरू झाल्याने हा परिसर पुन्हा गजबजू लागला आहे.
एक महिन्याच्या सुटीनंतर वकील जोमाने कामाला लागले आहेत. याचबरोबर पक्षकारही न्यायालयात हजर होत आहेत. न्यायालयातील तात्कालिन न्यायाधीशांची इतरत्र बदली झाल्याने नूतन न्यायाधीश दाखल झाले आहेत. आता त्यांनी आपल्या कामकाजाला सुरुवात केली असून पूर्ववत सर्व कामे सुरू झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
सोमवार हा सुटीनंतरचा पहिला दिवस होता. त्यामुळे अनेकांनी खटले दाखल केले. तसेच न्यायालयातील कर्मचाऱयांनीही खटले दाखल करून घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे आता एक-दोन दिवसांत पूर्ण क्षमतेनुसार काम सुरू होण्याची शक्मयता आहे. न्यायालय परिसरात गर्दी वाढू लागली आहे. वाहनांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे न्यायालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आता पुन्हा गर्दी वाढताना दिसत आहे. एकूणच पक्षकार आता न्यायालयात दाखल होऊन आपला खटला लवकरात लवकर सुटावा, यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.