शेतकरी वर्ग चिंतेत
न्हावेली/ वार्ताहर –
मळेवाड येथील (पानाचे भोम ) सड्या वरील शेतात सध्या गव्या रेड्यानी शेतकऱ्यांची झोपच पळविली.येथील शेतात शेतकऱ्यांनी सध्या भुईमूग,भातशेती,नाचणी पिकाची शेती केली आहे.सध्या शेती सुद्धा चांगली झाली आहे.मात्र गव्या रेड्यांच्या कळपाने शेतकऱ्यांचे तोंडचे पाणीच पळविले.येथील शेतकरी दिवस रात्र शेतीची राखण करतात,मात्र शेतकऱ्यांची नजर चुकवत हा गव्यांचा कळप येऊन शेताची नासधूस करत आहे.यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून,याबाबत लवकरात लवकर वनविभागाने तात्काळ दखल घेऊन,शेतीचे पंचनामे करून,गाव्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.