सी. राजगोपालचारी यांचे पणतू
वृत्तसंस्था /चेन्नई
भारताचे पहिले गव्हर्नर जनरल सी. राजगोपालचारी यांचे पणतू सी.आर. केसवन यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना स्वतःच्या राजीनाम्याचे पत्र त्यांनी पाठविले आहे. केसवन यांनी 2001 साली काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. विदेशातू केवळ देशाची सेवा करण्यासाठी मी परतलो होतो, परंतु आता पक्षाकडून याकरता संधी दिली जात नाही. पक्षाने सध्या घेतलेल्या भूमिकेवर मी सहमत नाही. याचमुळे मी राष्ट्रीय स्तरावर एक संघटनात्मक जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला होता. तसेच भारत जोडो यात्रेत सामील होणे टाळले होते. माझ्यासाठी ही नवा मार्ग शोधण्याची वेळ आहे आणि याचमळे मी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे केसवन यांनी पत्रात नमूद केले आहे. यशस्वी कारकीर्द सोडून मी 2001 साली देशसेवेसाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. हा माझा प्रवास आव्हानांनी भरलेला असला तरीही मी अनेक पदांवर काम केले असल्याचेही केसवन यांनी खर्गेंना उद्देशून लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.