वळिवाचा फटका : ओला-सुका चारा खराब झाल्याने नुकसान : चारा कोठून आणायचा शेतकऱयांसमोर प्रश्न
प्रतिनिधी /बेळगाव
सुगी हंगामादरम्यान झालेला अती पाऊस आणि सध्या होत असलेल्या वळीव पावसामुळे मोठय़ा प्रमाणात ओल्या आणि सुक्मया चाऱयाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे येत्या काळात चारा टंचाईचे संकट उभे ठाकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जिल्हय़ात 28 लाखाहून अधिक पशुधनाला चारा कोठून आणायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्हय़ात ऑक्टोबर, नोक्हेंबर दरम्यान अधिक प्रमाणात पाऊस झाला होता. त्यामुळे चारा खराब होऊन नुकसान झाले आहे. त्यानंतरही शेतकऱयांनी काही प्रमाणात चारा साठवून ठेवला होता. मात्र सध्या होत असलेल्या वादळी वळिवाच्या पावसामुळे शिल्लक चारादेखील खराब झाला आहे. त्यामुळे आगामी काळात पशुपालकांसमोर चारा संकट निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
ओला चाराही कुजला
यंदा जिल्हय़ात तब्बल 16 लाख 45 हजार 188 मेट्रिक टन चारा साठा शिल्लक असल्याची माहिती पशुसंगोपन खात्याने दिली होती. मात्र अवकाळी आणि वळिवामुळे चारा मोठय़ा प्रमाणात खराब झाला आहे. विशेषतः सुका चारा अधिक खराब झाल्याने पावसाळय़ात जनावरांना काय घालावे, असा प्रश्नदेखील पशुपालकांना पडला आहे. दरम्यान, पशुसंगोपन खात्याने 26 आठवडे चाऱयाचा तुटवडा निर्माण होणार नाही असे स्पष्ट केले होते. मात्र पावसामुळे सुक्मया चाऱयाबरोबर ओला चाराही कुजल्याने चारा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.
जिल्हय़ात 28 लाखांहून अधिक जनावरे
जिल्हय़ात तब्बल 28 लाखांहून अधिक जनावरे आहेत. त्यामध्ये गाय, म्हैस, शेळय़ा, मेंढय़ा, गाढव, घोडा, डुक्कर आदींचा समावेश आहे. या जनावरांना विशेषतः चाऱयाची गरज असते याकरिता पशुपालक उन्हाळाच्या दिवसातच चाऱयाची साठवणूक करतात. मात्र यंदा उन्हाळय़ातच अधिक पाऊस झाल्याने सुका चारा खराब झाला आहे. त्यामुळे चाऱयाच्या किमतीही गगनाला भिडणार आहेत.
चारा छावण्यांची गरज भासण्याची शक्यता
पशुपालक जनावरांना मका, बाजरी, ज्वारी, सुका चारा म्हणून पिंजर आणि करड, उसाची वाडे घालतात. मात्र यंदा सर्वच चारा पिकांना फटका बसल्याने चारा मिळणे मुश्कील बनले आहे. शिवाय काही सुका चारा शिवारातच खराब झाला आहे. त्यामुळे चारा समस्या गंभीर बनण्याची शक्मयता आहे. त्यामुळे यंदा जिल्हय़ात चारा छावण्या उभारण्याची गरज भासणार आहे.
गरज भासल्यास चारा छावण्या सुरू करू
जिल्हय़ात चारा मुबलक प्रमाणात शिल्लक आहे. मात्र काही तालुक्मयांमध्ये वळिवाचा पाऊस अधिक प्रमाणात झाल्याने चाऱयासाठी इतर जिल्हय़ांवर अवलंबून रहावे लागणार आहे. शिवाय गरज भासल्यास चारा छावण्या सुरू केल्या जाण्याची शक्यता आहे.
– ए. के. चंद्रशेखर (उपनिर्देशक, पशुसंगोपन खाते)