असह्य उष्णतेने हैराण झालेल्या हजारो नागरिकांचा मोर्चा नदीवर
उदय सावंत /उस्ते /नगरगाव
गेल्या पंधरा दिवसांपासून सत्तरी तालुक्मयात उष्णतेचे प्रमाण प्रचंड प्रमाण वाढलेले आहे. यामुळे उष्णतेने हैराण झालेले नागरिक थंडाव्यासाठी सत्तरीत विविध ठिकाणी जलसिंचन खात्यातर्फे उभारलेल्या बंधाऱयाच्या पाण्यात आंघोळ करतानाचे चित्र आहे. खासकरून रविवार व सुट्टीच्या दिवशी प्रचंड प्रमाणात नागरिकांचा मोर्चा नदीवर वळताना दिसत आहे.
सत्तरी तालुक्मयातील उस्ते येथे उभारलेल्या बंधाऱयावर आंघोळीसाठी नागरिक मोठय़ा संख्येने भेट देत आहेत. रविवारी सुट्टीच्या दिवशी जवळपास दीड ते दोन हजारांपेक्षा जास्त नागरिक व पर्यटक या बंधाऱयावर मौजमजा करताना दिसत आहेत. यामुळे हल्लीच्या काळात सदर बंधारा म्हणजे पर्यटकांना आनंद मौजमजा करण्यासाठी नवीन पर्यटन स्थळ म्हणून विकसित होऊ लागलेले आहे. त्यामुळे येणाऱया काळात उस्ते याठिकाणी पर्यटकांसाठी चांगल्या प्रकारच्या सुविधा निर्माण केल्यास सदर भागातील विकासाला चालना मिळणार आहे.
गेल्या जवळपास पंधरा दिवसांपासून उष्णतेचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे. कडक ऊन्हामुळे वाढत्या उष्णतेच्या प्रमाणामुळे थंडाव्यासाठी नागरिकांचे पाय नदीकडे वळत आहेत. यामुळे नदीवरील बंधाऱया पाण्यात आंघोळ करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.
नगरगाव पंचायत क्षेत्रातील उस्ते याठिकाणी उभारण्यात आलेला बंधारा सध्यातरी पर्यटकांसाठी व नागरिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरू लागला आहे. जवळपास 120 कोटी खर्चून सत्तरी तालुक्मयातील म्हादई, वेळूस, रगाडा वाळवंटी अशा अनेक नद्यावर बंधाऱयांची साखळीच उभारली आहे. यामुळे मोठय़ा प्रमाणात पाणी साठलेले असते. अशा बंधाऱयाच्या पाण्यात नागरिक आंघोळीसाठी जातात. म्हादई नदीचे पाणी हे प्रदूषणविरहित आहे. यामुळे या नद्यांवर अंघोळ करण्यासाठी लोक जास्त पसंती देत असल्याचे चित्र आहे.
बंधारा परिसरात टॉयलेट, चेंजिगरुम सुविधा हवी!
संबंधित बंधारा परिसरात टॉयलेट व चेंजिगरुमची सुविधा उपलब्ध केल्यास उन्हाळय़ात जास्तीतजास्त पर्यटक आकर्षित होऊ शकतात. नगरगाव पंचायतीने या साठी पुढाकार घेऊन या ठिकाणी टॉयलेट व कपडे बदलण्याची सोय निर्माण करून योग्य शुल्क आकारल्यास पंचायतीच्या महसुलातही भर पडेल, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.