वाढत्या उष्णतेमुळे आंघोळीसाठी नागरिकांची पसंती : स्थानिक पंचायतीने पर्यटन सुविधा निर्माण करण्याची मागणी
वाळपई / प्रतिनिधी
सध्या उष्णतेचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांचीत आंघोळ करण्यासाठी जलसिंचन खात्याच्या उस्ते सत्तरी येथील बंधाऱयावर गर्दी मोठय़ा प्रमाणात होत आहे.
गेल्या काही महिन्यापासून प्रचंड प्रमाणात वाढणारी गर्दी व सभोवताली परिसरामध्ये असलेले निसर्गसौंदर्य याची दखल घेऊन पर्यटन खाते तसेच पर्यटन महामंडळाने येथे आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्या, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
वाढत्या उष्णतेमुळे नागरिक सध्या तरी गोडय़ा पाण्याच्या आंघोळीवर भर देताना दिसत आहेत. मासोर्डे येथील नैसर्गिक झर व सध्या नगरगाव पंचायत क्षेत्रातील उस्ते येथील बंधारा हा नागरिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.
दोन्ही ठिकाणे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अनुकूल असल्यामुळे याठिकाणी सत्तरीसह इतर तालुक्मयातील लोक आपल्या कुटुंबासह या ठिकाणी आंघोळ करण्यासाठी येतात.
प्रदूषणविरहित जलाशय
जलसिंचन खात्यातर्फे उभारलेल्या या बंधाऱयात मोठय़ा प्रमाणात पाणी साठा आहे. बंधाऱयाच्या खांबामध्ये घातलेल्या लोखंडी फळय़ांवरून पाणी खाली ओतते. त्यामुळे एखाद्या धबधब्याखाली आंघोळ करत असल्याची मजा लोक घेतात. मुलेही याठिकाणी मतसोक्त आनंद लुटताना दिसतात. ही नदी हा म्हादई नदीचा फाटा असल्यामुळे येथील पाणी प्रदूषणविरहित आहे.
पंचायतीने सुविधा दिल्यास महसूलही मिळू शकतो
पावसाळा संपल्यानंतर लोखंडी फळय़ा घालून जलसिंचन खात्यातर्फे ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ योजनेंतर्गत सदर पाणी अडविले आहे. या बंधाऱयावर आंघोळीसाठी मोठी गर्दी असते, मात्र या ठिकाणी पर्यटकांसाठी अपेक्षित सुविधा उपलब्ध नाहीत. नगरगाव पंचायतीने या ठिकाणी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र याकडे दुर्लक्ष झालेले दिसत आहे. या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून पंचायतीने कमीत कमी शुल्क आकारल्यास पंचायतीच्या महसुलातही वाढ होऊ शकते. यासाठी पंचायत मंडळाने विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी व्केलेली आहे.
याच नदीवर उस्ते भागातून पावसाळी मोसमात वॉटर राफ्टिंग हा पर्यटन खात्याचा विशेष उपक्रम राबविला जात आहे. यातून पंचायतीला चांगला महसूल प्राप्त होतो. या ठिकणी आवश्यक सुविधा उपलब्ध झाल्यास पंचायतीला कायमस्वरुपी महसूल प्राप्त होणार असल्याचे अनेक नागरिकांचे मत आहे.
स्थानिक आमदार विश्वजित राणे यांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कारण उस्ते येथील बंधाऱयाच्या माध्यमातून नागरिकांची होणारी गर्दी व सभोवताली परिसरात नैसर्गिक सौंदर्य प्राप्त झाल्यामुळे या ठिकाणी पर्यटन विकसित होऊ शकते. सदर बंधाऱयातील साठलेल्या जलाशयावर बोटिंग किंवा क्रीडा उपक्रम राबविल्यास त्याचा फायदा पंचायतीसह या भागातील विकासासाठी लाभ होऊ शकतो.