शुक्रवारी आलेल्या चक्री वादळाचा शिवाजी विद्यापीठातील झाडांना फटका
प्रतिनिधी/कोल्हापूर
शिवाजी विद्यापीठाला ऑक्सीजन हब म्हणून ओळखले जाते. शुक्रवारी आलेल्या चक्रीवादळात विद्यापीठ परिसरातील 300 झाडांचे नुकसान झाले आहे. चक्रवादळात वरून दाब पडल्याने ही जवळपास 50 झाडे उन्मळून पडली आहेत. तसेच मुलींच्या वसतिगृहाचे गेटही पडले परंतू जीवितहानी किंवा गाडय़ांचे कोणतेही नुकसान झालेले नाही. परदेशी वाणांच्या झाडाचा धोका असल्याचे चक्रीवादळाच्या माध्यमातून निसर्गाने दाखवून दिले आहे.
चक्रीवादळाचा फटका जिहय़ातील अनेक झाडांना झाला असला तरी शिवाजी विद्यापीठातील 300 झाडांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पडलेल्या झाडांपैकी 99 टक्के झाडे परदेशी वाणाची आहेत. यामध्ये सिडीया आफ्रिकन पिलो, गुलमोहर, सोममोहर, निलमोहर, रेन ट्री, तरोड, आफीकन टय़ुलिफ, अकेशिया, सुबाभुळ, निलगिरी आदी झाडांची पडझड झाली असून काही झाडे उन्मळून पडली आहेत. तर कडूलिंब, पांढरे खैर अशी दोन देशी झाडे उन्मळून पडली असून शिरीष झाडाच्या फांद्या मोडल्या आहेत. विदेशी झाडांवर पाखर आपल घरट बांधत नाहीत, फुलपाखर त्या झाडांच्या फुलावर बसत नाहीत. आफीकन टय़ुलिफ या झाडाच्या फुलावर मधमाशा बसल्या तर मरतात. अशी ही झाडे घातक आहेत, त्यामुळे विदेशी वाणाची झाडे लावली पाहिजेत. परंतू या झाडांपासून मिळणारा ऑक्सीजन भरपूर प्रमाणात होता, तो आता कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
देशी झाडे लावण्याचा मानस
विदेशी झाडांपासून प्रचंड प्रमाणात नुकसान होते, हे चक्रीवादळाच्या माध्यमातून निसर्गाने दाखवून दिले आहे. त्यामुळे विद्यापीठातील जैवविवधता टिकवण्यासाठी देशी वाणांची जास्तीत जास्त झाडे लावण्याचा मानस आहे.
डॉ. व्ही. एन. शिंदे (कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ)