ऑनलाईन टीम/तरुण भारत
कोल्हापूर: राज्यात आतापर्यंत दिड टक्के पेरणी झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दीड टक्याने पेरणी कमी झाली आहे. मात्र घाबरण्याचे काही कारण नाही. पुढील चार ते पाच दिवसात पाऊस पडेल अशी आशा वाटते. यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी करावी असे आवाहन कृषीमंत्री दादा भुसे (Dada Bhuse)यांनी केले.कोल्हापुरात (Kolhapur) पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्य़ांनी विधानपरिषद निवडणुकीत महाविकासआघाडी 100 टक्के विजयी होईल असा विश्वास व्यक्त केला.
पुढे बोलताना ते म्हणाले, राज्यव्यापी आढावा घेतला तर 28 तालुक्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. अशाठिकाणी दीड टक्के पेरणी झाली आहे. ज्या ठिकाणी पेरणी झाली आहे. अशाठिकाणी दुबार पेरणी घेण्यास काही अडचण येणार नाही.गेल्या वर्षी यादरम्यान 3 टक्के पेरणी झाली होती. मात्र घाबरण्याचे काही कारण नाही. पुढील चार ते पाच दिवसात पाऊस पडेल आणि आमचा शेतकरी राजा सुखावेल असेही ते म्हणाले.
हेही वाचा- साताऱ्यात तिहेरी हत्याकांडाने खळबळ; संशियित आरोपी पोलिसांच्या ताब्यात
राज्यसभेत मविआच्या एका उमेदवाराला हार पत्करायला लागली. त्यामुळे विधानपरिषद निवडणूकीवर याचा परिणाम होवू नये म्हणून मविआ तयारीला लागली आहे. त्यातच मविआमध्ये धुसफूस असल्याचे विरोधी पक्षाकडून बोलले जात आहे यासंदर्भात बोलताना दादा भुसे म्हणाले, तिन्ही पक्षामध्ये कोणतीही धुसफूस नाही.शिवसेनेचे सर्व आमदार आणि मंत्री आज संध्याकाळीच मुंबईत एकत्र जमणार आहेत.उद्या एकत्र येण्याचे नियोजन होते मात्र आजच मुंबईत सर्वजण दाखल होतील. विधीानपरिषदेत मविआचे सर्व उमेदवार 100 टक्के निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला.