प्रतिनिधी/ दहिवडी
माण तालुका पंचायत समिती च्या इमारतीला गळती लागली असून ती इमारत पडण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे तिथे कामानिमित्त येणाया नागरिकांच्या व कर्मचायांसह तिथं असलेल्या संबंधित अधिकायांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.
माण तालुका पंचायत समितीच्या प्रशासकीय कार्यशैलीवर आधीच नागरिकांचा आक्षेप असतानाच सदर इमारतीची झालेली दुर्दशा पाहता तिथे आपल्या कामानिमित्त येणाया नागरिकांना दिसत आहे परंतु हे प्रशासनाच्या अजूनही का लक्षात आले नाही ? सदर इमारतीची दुरुस्ती अजूनही का झाली नाही? अधिकायांच्या डोळ्यांना हे दिसत नाही का? माण पंचायत समितीचा बांधकाम विभाग काय करत आहे, असे सवाल जनतेच्या माध्यमातून उमटताना दिसत आहेत.
या सदर गोष्टीची दखल घेऊन इमारतीच्या दुरुस्तीची तजवीज माण पंचायत समितीचे बांधकाम विभाग करणार की इमारत
कोसळून एखाद्याला जखमी होण्याची किंवा जीव गमावण्याची वेळ येण्याची वाट पाहणार हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.
माण तालुक्यातील येणारे प्रत्येक नागरिक हा आपला जीव मुठीत धरून कार्यालयात प्रवेश करतो व
तेथील काम करणारे कर्मचारी सुद्धा आपले जीवाची परवा न करता लोकांनसाठी काम करत आहेत याची वरिष्ठांनी योग्य ती दखल घ्यावी अशी चर्चा सर्वसामान्य नागरिकांतून केली जात आहे.