दौंड तालुक्यातील पारगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये भीमा नदीपात्रात (Bhima River) एकाच कुटुंबातील सात जणांनी आत्महत्या केल्याची घटना घटली आहे. मागील दोन दिवसापुर्वी याच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह आढळून आले होते त्यानंतर बेपत्ता असलेल्या तीन लहान मुलांचेही मृतदेह पुढील तपासात याच नदीपात्रात आढळून आले. गेल्या चार पाच दिवसापासून शोध कार्य सुरु असेलेल्या या परिसरात एकापाठोपाठ सात मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा >>> ऊसतोड मजुरांच्या दोन मुलांचा बुडून मृत्यू
बुधवारी 18 तारखेला एका मच्छिमाराला एक मृतदेह आढळून आला. त्यानंतर एका मागून एक असे तीन मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ माजली. आज मंगळवारी आणखी तीन लहान मुलांचे मृतदेह सापडले. हे सातही लोक एकाच कुटुंबातील असल्याचे निष्पण्ण झाले आहे.
मोहन उत्तम पवार (वय 50), संगीता मोहन पवार (वय- 45 दोघे रा. खामगांव ता. गेवराई), त्यांचा जावई शामराव पंडित फुलवरे (वय-32) त्याची पत्नी राणी शामराव फुलवरे (वय-27) त्यांचा मुलगा रितेश शामराव फुलवरे (वय-7), छोटू फुलवरे (वय-5), कृष्णा (वय-3) अशी या कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत. हे नातेवाईक मातीवडार समाजातील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
पवार आणि फुलवरे कुटुंब या परिसरात शेतमजुरी, माती खोदकाम, उसतोडणी अशी कामे करत होते. यातील मोहन पवार यांच्या छोट्य़ा मुलग्याने अनिल पवार (वय-20) याने आपल्याच समाजातील महिलेला घेऊन पळून नेला होता. अनिलने महिलेला घेऊन पळून गेल्याचे समजताच मोहन पवार यांनी त्याच दिवशी पालासह कुटुंबास घेऊन बदनामीच्या भितीने दुसरीकडे मुक्काम हलवला. पण त्यांच्या कुटुंबाच्या आत्महत्येने या परिसरात शोककळा पसरली आहे.