खानापूर
बेटगिरी येथील महिलेच्या अंगावर वीज कोसळून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. सदर महिलेला गावातील नागरिकांनी उपचारासाठी बेळगावच्या शासकीय इस्पितळात नेण्यात आले होते. तेथील डॉक्टरांनी तपासणी करून त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. मनीषा दत्तू गुरव (वय 42) असे मयत महिलेचे नाव आहे.
याबाबतची माहिती अशी की, खानापूर तालुक्मयातील बेटगिरी येथे शेतात काजू बिया गोळा करत असताना सायंकाळी 5 वाजता झालेल्या जोरदार वादळी पावसावेळी वीज कोसळून मनीषा दत्तू गुरव (वय 40) यांचा मृत्यू झाला. मनीषा या रोजच्याप्रमाणे काजू बिया गोळा करण्यासाठी आपल्या शेतात गेल्या असता वीज कोसळून त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. यावेळी शेतात काम करणाऱया इतर लोकांनी त्यांना बेळगाव येथील सरकारी इस्पितळात नेले. डॉक्टरांनी मनीषा यांची तपासणी करून त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. मनीषा यांच्या छातीवर विजेचा मारा झाल्याने छातीवर जखम झाली होती.
मनीषा यांचे पती दत्तू गुरव हे गोल्याळी ग्राम पंचायतीमध्ये वॉटरमन म्हणून काम पाहतात. मनीषा यांच्या पश्चात पती, दोन मुली, एक मुलगा, सासू-सासरे असा परिवार आहे. विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. महसूल खात्याच्यावतीने मृताच्या कुटुंबीयांना शासकीय मदत देण्यात येईल, असे सांगण्यात आले.