17 जिल्हय़ांमध्ये फैलावला जीवघेणा त्वचारोग
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
गुजरातमध्ये लम्पी विषाणूचे संक्रमण 16 जिल्हय़ांपर्यंत पोहोचले आहे. केवळ कच्छ जिल्ह्य़ातच 23 एप्रिलपासून 30 जुलैपर्यंत 1240 बैल-गायींचा मृत्यू झाला आहे. जीवघेण्या त्वचारोगाचे संक्रमण पाहता राज्य सरकारने पशूमेळय़ांवर बंदी घालत सर्वेक्षण, उपचार आणि लसीकरणाला वेग दिला आहे. या संक्रमणामुळे शनिवारपर्यंत 1,240 हून अधिक प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. तर बचावासाठी 5.74 लाखाहून अधिक पशूंचे लसीकरण करण्यात आले आहे. संक्रमणाचे संकट प्रामुख्याने सौराष्ट्र विभागात दिसून आल्याची माहिती राज्याचे कृषी तसेच पशूपालन मंत्री राघवजी पटेल यांनी दिली आहे. कच्छ, जामनगर, देवभूमी, द्वारका, राजकोट, पोरबंदर, मोरबी, सुरेंद्रनगर, अमरेली, भावनगर, बोटाद, जूनागढ, गिर सोमनाथ, बनासकांठा, पाटन, सूरत, अरावली आणि पंचमहल हे जिल्हे प्रभावित ठरले आहेत. याचदरम्यान काँग्रेसने सरकारवर आजारासंबंधी अचूक आकडा जाहीर न केल्याचा आरोप केला आहे. तसेच पशूधन गमाविणाऱया शेतकऱयांना भरपाई देण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.