वृत्तसंस्था/ इम्फाळ
मणिपूरमधील एका रेल्वे बांधकामानजीक झालेल्या भूस्खलनामुळे 29 नागरिकांना प्राण गमवावा लागला आहे. ढिगाऱयाखाली अजूनही माणसे असावीत, असे अनुमान असून त्यांच्या जिवंत राहण्याची शक्मयता जवळपास नसल्याचे सांगण्यात आले असून शोधकार्य मात्र सुरू आहे. आतापर्यंत 38 जणांचे प्राण वाचविण्यात विविध केंद्र आणि राज्य सरकारी साहाय्यता संस्थांना यश आले आहे. ढिगारा उपसण्यासाठी अर्थमुव्हर्सचा उपयोग करण्यात येत असून काही ठिकाणी नागरिक स्वतःच्या हाताने दगड बाजूला करून अडकलेल्या नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. केंद्र सरकारने 470 सुरक्षासैनिकांचे कवच साहाय्यता कार्याला दिले आहे. काही केंद्रीय यंत्रणाही काम करत आहेत.