प्राध्यापकांच्या कामबंद आंदोलनाचा परिणाम ः विद्यार्थ्यांचे होणार नुकसान
प्रतिनिधी/ बेळगाव
पेपर तपासणीच्या मानधनात वाढ करण्यासह इतर विविध मागण्यांसाठी बेळगाव, विजापूर, बागलकोट या तीन जिल्हय़ातील मूल्यमापनासाठी आलेल्या प्राध्यापकांचे कामबंद आंदोलन शुक्रवारपासून सुरू आहे. या आंदोलनाचा परिणाम पदवी अंतिम वर्षाच्या निकालावर होणार असून यातून तोडगा न निघाल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे.
राणी चन्नम्मा विद्यापीठांतर्गत येणाऱया पदवी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे पेपर तपासले जात आहेत. शहरातील चार केंद्रांवर पेपर तपासणी सुरू आहे. परंतु शुक्रवारपासून पेपर तपासणी करणाऱया प्राध्यापकांकडून कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. प्राध्यापक संघटनेने आठवडय़ाभरापूर्वी विद्यापीठाच्या कुलगुरुंना निवेदन देऊन मागण्या मान्य करण्याचे आवाहन केले होते. परंतु 2 नोव्हेंबरपर्यंत आरसीयूकडून कोणतीच हालचाल न झाल्याने अखेर शुक्रवारपासून प्राध्यापकांनी कामबंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
पदवी अंतिम वर्षाची पेपर तपासणी सुरू आहे. प्राध्यापकांच्या कामबंद आंदोलनामुळे पेपर तपासणी ठप्प आहे. आधीच निकाल लागण्यामध्ये विलंब झाला असताना त्यातच आता प्राध्यापकांच्या आंदोलनामुळे आणखी उशीर होणार आहे. अनेक विद्यार्थी पदवीनंतर इतर विद्यापीठांमध्ये प्रवेश घेणार असल्याने वेळेत निकाल लागणे गरजेचे आहे. परंतु सुरू असलेल्या या गोंधळाचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होणार आहे. त्यामुळे विद्यापीठाने यातून तोडगा काढून मूल्यमापन प्रक्रिया सुरळीत करण्याची मागणी होत आहे.
दुसऱया दिवशी आंदोलन सुरू
आरसीयूअंतर्गत येणाऱया मूल्यमापन प्राध्यापकांनी सलग दुसऱया दिवशी आंदोलन केले. विद्यापीठाचे कुलगुरु नसल्याने प्राध्यापक संघटना व विद्यापीठामध्ये चर्चा होऊ शकली नाही. रजिस्ट्रारनी कुलगुरु सध्या बेळगावमध्ये नसल्याने मागण्या मान्य करणे शक्मय नसल्याचे सांगितल्याने प्राध्यापकांचे आंदोलन आणखी चिघळले आहे.