बेळगाव : महानगरपालिकेच्या प्रवेशद्वाराजवळच पाणी साचून राहात आहे. त्यामुळे तेथून ये-जा करणे अवघड जात आहे. मात्र या पाण्याचा निचरा करण्यासाठी महानगरपालिकेचे अधिकारी लक्ष देण्यास तयार नसल्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोरच ही परिस्थिती निर्माण झाल्याने जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कामासाठी ये-जा करणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होत आहे. तेव्हा येथील पाण्याचा निचरा करण्यासाठी तेथील कर्मचाऱ्यांनी उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे. तेव्हा याकडे महानगरपालिकेचे अधिकारी लक्ष देणार का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
Previous Articleन्यायालय आवारात पुन्हा वाहतूक कोंडी
Next Article मुतगे कृषी पत्तीनसमोर तिसऱ्या दिवशीही ठिय्या
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.