बेळगाव : सदाशिवनगर स्मशानभूमी येथील अंत्यसंस्कार करण्याच्या शेडवरील पत्रे उडून गेले आहेत. याबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही अद्याप पत्रे बसविण्यात आले नाहीत. पावसाळ्यापूर्वी या शेडवर पत्रे घालावेत. जेणेकरून अंत्यसंस्कार करण्यात अडचण येणार नाही, अशा मागणीचे निवेदन स्वराज्य युवा दलाच्यावतीने साईराम जहांगीरदार यांनी महानगरपालिका आयुक्तांना दिले आहे. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. शेडवर पत्रे नाहीत. बऱ्याचदा येथील दिवे बंद असतात. आसपास बरीच अस्वच्छताही आहे. याची दखल घेऊन लवकरात लवकर या गैरसोयी दूर कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी सौरभ सावंत, अवधूत तुडवेकर, विवेक महांतशेट्टी व दर्शन हावळ उपस्थित होते.
Previous Articleबालकामगारांच्या संरक्षण-पुनर्वसनासाठी समन्वयाने काम करा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.