प्रतिनिधी /बेळगाव
केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून दिव्यांगांना देण्यात येणारे प्रोत्साहन धन हे अत्यंत कमी आहे. त्यामुळे त्यावर जीवन जगणे कठीण आहे. महागाई वाढली आहे. मात्र आमच्या प्रोत्साहन धनामध्ये कोणतीही वाढ नाही. यामुळे आम्ही अडचणीत आलो असून आमच्या या प्रोत्साहन धनामध्ये वाढ करावी, अशी मागणी दिव्यांग व्यक्तींनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सध्या 75 टक्क्मयांपेक्षा अधिक दिव्यांग आहेत. त्यांना 1400 रुपये तर 75 टक्क्मयांपेक्षा कमी असलेल्या दिव्यांगांना 800 रुपये प्रोत्साहन धन दिले जात आहे. मात्र यामध्ये गुजराण करणे कठीण झाले आहे. 75 टक्क्मयांपेक्षा अधिक दिव्यांग असलेल्या व्यक्तींना किमान चार ते पाच हजार रुपये प्रोत्साहन धन द्यावे तर कमी दिव्यांग असलेल्यांना 2 हजार रुपये प्रोत्साहन धन द्यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी नेमीनाथ बस्तवाडकर, उमेश रोट्टी, पार्वतव्वा हुलकुंद, नागाप्पा सानिकोप्प, महादेवी कित्तूर, निंगव्वा मादर, अब्दुल पिरजादे, शकिलाबानु सुतगट्टी व रामव्वा आदी उपस्थित होते.