ऑनलाईन टीम / मुंबई
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शुक्रवारी मुंबई विद्यापीठामध्ये कलिना कॅम्पसमध्ये नवीन वसतिगृह इमारतीचे उद्घाटन केले. नव्याने बांधलेल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाला स्वातंत्र्य सैनिक विनायक दामोदर सावरकर यांचे नाव देण्याची विनंतीही त्यांनी केली होती. कुलगुरूंना विनंती करताना राज्यपाल म्हणाले की “आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाला सावरकरांचे नाव दिल्याने विद्यार्थ्यांच्या हृदयात आणि मनात भारताबद्दल आदर वाढेल.”
अधिक वाचा- आम्हीच शिवसेना, विधिमंडळात पक्ष म्हणून मान्यता; एकनाथ शिंदेंचा दावा
पण छात्रभारती विद्यार्थी संघटनेने छत्रपती शाहू महाराज यांचे नाव देण्य़ाची मागणी केली आहे. या विद्यार्थी संघटनेच्या या मागणीने नामकरणाचा वाद चिघळण्याची शक्यता आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मतानुसार ” छ. शाहुमहाराज यांना संपुर्ण देशामध्ये वसतीगृह या संकल्पनेचे उद्घाते मानले जाते. छ. शाहू महाराज यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या कामगिरीमुळे तसेच यंदाचे वर्ष हे महारीजांच्या स्मृतीशताब्धी वर्ष असल्याने या आंतरराष्ट्रिय विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाला महाराजांचे नाव देण्यात यावे.” अशी मागणी संघटनेने केली आहे.