वार्ताहर /सांबरा
सांबरा परिसरातून गेलेल्या बळ्ळारी नाल्याच्या पात्रात साधारण तीस वर्षांपूर्वी बांधलेला काँक्रीटचा बांध सध्या अडथळा ठरू पाहत आहे. परिणामी पावसाळय़ात नाल्याच्या आवारातील शेती पाण्याखाली जात आहे. यासाठी सदर बांध संबंधित अधिकाऱयांनी तातडीने हटवावा, अशी मागणी शेतकऱयांतून होत
आहे.
साधारण तीस वर्षांपूर्वी शासनाच्या पाणी अडवा पाणी जिरवा योजनेंतर्गत सांबरा परिसरातील बळ्ळारी नाल्याच्या पात्रात एक काँक्रीटचा बांध बांधण्यात आला होता. सध्या हा बांध शेतकऱयांना डोकेदुखी ठरला आहे. या बांधामुळे नाल्यातून वाहून येणारा केरकचरा व प्लास्टिक तिथेच थांबून राहत आहे. परिणामी पावसाळय़ात पात्रातील पाणी बाहेर पडून शिवारातील हजारो एकर शेती पाण्याखाली जात आहे. त्यामुळे दरवषी शेतकऱयांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे. यासाठी संबंधित अधिकाऱयांनी प्रत्यक्ष पाहणी करून काँक्रीटचा बांध हटवावा, अशी मागणी शेतकऱयांनी केली आहे.
सध्या पाऊस उंबरठय़ावर असून येत्या काही दिवसात त्याचे आगमन होणार आहे. त्यासाठी पाऊस सुरू होण्याआधीच संबंधित अधिकाऱयांनी तो बांध हटवून शेतकऱयांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. याबाबतचे निवेदन आठ दिवसांपूर्वी सांबरा ग्रामपंचायतीला देण्यात आले. मात्र, अद्याप ग्रामपंचायतीने कोणत्याच हालचाली केलेल्या नाहीत.
पाण्याचा निचरा होण्यास अडथळा
नाल्याच्या पात्रामध्ये असलेल्या त्या काँक्रीटच्या बांधामुळे नाल्यातील पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होत आहे. परिणामी पावसाळय़ात पात्रातील पाणी बाहेर पडून शिवारात केरकचरा यासह पाणी साचत आहे व पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान होत आहे. हे टाळण्यासाठी संबंधित अधिकाऱयांनी सदर बांध तातडीने हटविणे गरजेचे आहे.
– एस. आर. देसाई, शेतकरी-सांबरा