प्रतिनिधी /बेळगाव
अनगोळ व उद्यमबाग रस्त्यावरील नाल्याजवळ टाकण्यात येणाऱया मांसाहारी कचऱयामुळे भटक्मया कुत्र्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. ही कुत्री अचानकपणे ये-जा करणाऱयांवर तसेच दुचाकींवर हल्ला करत आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून येताना सर्वांनाच जीव मुठीत धरून यावे लागत आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले असून तातडीने या परिसरातील कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी अनगोळ परिसरातून होत आहे.
अनगोळ-उद्यमबाग या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते. शाळा, महाविद्यालये आणि कामगारांची संख्या मोठी आहे. महिला देखील या परिसरातून ये-जा करत असतात. या रस्त्यावर असलेल्या नाल्याजवळ कुत्र्यांचा कळप त्या परिसरात ठाण मांडून असतो. चिकन दुकानातील टाकाऊ पदार्थ त्या ठिकाणी फेकले जात आहेत. कोंबडीच्या पोटातील घाण तसेच डोकी पोत्यात भरून फेकण्यात येतात. त्यावर ताव मारण्यासाठी ही कुत्री त्या ठिकाणी मोठय़ा संख्येने जमा झालेली असतात.
रात्रीच्यावेळी तेथून येताना अचानकपणे ती कुत्री हल्ला करत आहेत. बऱयाचवेळा वाहनांसमोर आडवी देखील येत असतात. त्यामुळे अपघात घडत आहेत. अनेक जण जखमी देखील झाले आहेत. विद्यार्थी आणि लहान मुलांमध्ये तर भीतीचे वातावरण पसरले आहे. या रस्त्यावरून रात्री ये-जा करणे धोक्मयाचे ठरत आहे. याचबरोबर या परिसरात दुर्गंधीही पसरली आहे. काही हॉटेलचालकही हॉटेलमधील ओला कचरा या नाल्याजवळच फेकून देत आहेत. तेव्हा संबंधित हॉटेलचालक तसेच चिकन दुकानदार यांना ताकीद करावी, अशी मागणीही होत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून अनगोळ परिसरात कुत्र्यांचा वावर वाढला आहे. त्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. या भटक्मया कुत्र्यांना पकडण्याची मोहीम महापालिकेने राबविणे गरजेचे आहे. अन्यथा लहान मुलांवर हल्ला करण्याची शक्मयता व्यक्त होत आहे. तेव्हा महापालिकेने याची दखल घेऊन तातडीने या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.