कर्नाटक राज्य रयत संघटनेचा सरकारकडे पाठपुरावा
प्रतिनिधी /बेळगाव
शेतकऱ्यांच्या ऊस पिकासाठी प्रतिटन 5 हजार 500 रुपये दर देण्यात यावा, तसेच राज्यातील पाणी योजना पूर्ण करण्यात याव्यात, शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगले दर देण्यात यावेत, अशा विविध मागण्यांसाठी कर्नाटक राज्य रयत संघटना आणि हसिरू सेनेच्यावतीने धरणे आंदोलन धरण्यात आले.
सुवर्णसौध येथे हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रयत संघटनेच्या विविध संघटनांनी आंदोलन छेडून शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने ठोस पाऊले उचलावीत, अशा मागण्या लावून धरल्या आहेत. बुधवारी येथील शिवराम एम. एस. यांच्या संघटनेच्यावतीने आंदोलन छेडून शेतकऱ्यांच्या समस्यांचे निवारण करण्याची मागणी करण्यात आली.