राष्ट्रिय कॉंग्रेस पक्षाच्या कर्नाटकातील कोलार येथिल ‘जय भारत’ कार्यक्रमात संबोधित करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कर्नाटकच्या जनतेसाठी योजना जाहीर केल्या. संसदेमधून अपात्र झल्यानंतर कर्नाटक विधानसभा निवडणूकीमध्ये जनसमुदायाला संबोधित करताना त्यांनी प्रत्येक घराला २०० युनिट मोफत वीज, प्रत्येक गृहिणीला २०० रुपये, अन्नभाग्य कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला दरमहा १० किलो तांदूळ तसेच बेरोजगार पदवीधरांना ३००० रुपये प्रति महिना देण्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावरही अदाणी प्रकरणावर जोरदार टिका केली.
कर्नाटकच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कोलार येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना भाजपवर जोरदार हल्ला चढवला. कर्नाटकात काँग्रेस पक्षाचे सरकार आल्यावर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत आश्वासन पुर्ण केली जातील, अशी खात्री गांधींनी दिली. ते म्हणाले, “मी कर्नाटकच्या नेत्यांना पहिल्याच कॅबिनेट बैठकीत जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यास सांगितले असून यास सहा महिने किंवा एक वर्षाचा कालावधी लागू नये.” असे निर्देश दिले आहेत.
पूढे बोलताना ते म्हणाले, “आम्ही कर्नाटकच्या जनतेला चार आश्वासने दिली आहेत. प्रत्येक घराला 200 युनिट मोफत वीज. गृहलक्ष्मी योजनेंतर्गत प्रत्येक महिलेला मासिक आधारावर रु. 2000. अन्नभाग्य योजनेंतर्गत कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला 10 किलो तांदूळ आणि बेरोजगार पदवीधरांना दरमहा 3000 रुपये या योजना पहिल्याच कॅबिनेट बैठकीत पूर्ण केल्या पाहिजेत,”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देताना त्यांनी कर्नाटकातील लोक संपुर्ण देशाला संदेश देतील असे म्हटले आहे. “आम्ही पंतप्रधानांना संदेश देऊ की जर तुम्ही अदानीला हजारो कोटी देऊ शकत असाल तर आम्ही गरीब, महिला आणि तरुणांनाही पैसे देऊ शकतो. तुम्ही अदानीला मनापासून मदत केली आहे आणि आम्ही राज्यातील जनतेला मनापासून मदत करणार.” असेही ते म्हणाले.