प्रतिनिधी/ सातारा
सफाई कामगार व झाडू कामगार यांच्यामध्ये शारिरीक विकलांग व आजारपण आहे, अशा कर्मचाऱयांचा विचार केला गेला नाही. जे कामगार कोणतेही व्यसन करत नाहीत व नियमीत कामावर हजर असतात. त्यांना नाहक त्रास देण्याच्या उद्देशाने ही कारवाई केली जात आहे, यासह विविध प्रश्नांवर सातारा पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱयांनी जोरदारपणे पालिकेच्या गेट बाहेर निदर्शने केली.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, हद्दवाढीनंतर सातारा शहराची उपनगरे शहराच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट झाली असाहेत. या उपनगरामध्ये स्वच्छतेच्या कारणास्तव सफाई कर्मचाऱयांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. जेणेकरुन वाढीव भागात सफाई योग्यरित्या होईल, अशा प्रकारच्या बदल्या आवश्यक आहेत. व नियमांना धरुन आहेत. हे आम्ही सुद्धा मान्य करतो. मात्र, सफाई कर्मचाऱयांच्या बदल्या न्यायपूर्ण आहेत का असा सवाल उपस्थित होत आहे. सफाई कर्मचाऱयांच्या बदल्यामध्ये अविचार भेदभाव दिसून येत आहे. आरोग्य निरीक्षक व इतर अधिकाऱयांना आपल्या सोयीनुसार अनुकूल कर्मचाऱयांना मुकादम केले आहे. अनुकूल नसणाऱया कर्मचाऱयांच्या बदल्या केल्या आहेत. सेवा ज्येष्ठतेनुसार सफाई कर्मचाऱयांना मुकादम पदावर नेमले नाही. साफसफाईसाठी नेमून दिलेल्या विभागामध्ये मुकादम कर्मचाऱयांच्या हजेऱया घेतात. व कामावर पाठवतात. मात्र आता एकत्रित हजेरीची पद्धत काढल्यामुळे कामगार व झाडू कामगार महिला हजेरीच्या ठिकाणी एकत्र येवून पुन्हा नेमून दिलेल्या विभागामध्ये कामावर जाणार आहेत.
या प्रक्रियेत कामगारांची किती ओढाताण होणार आसहे. याचा जरासुद्धा विचार आरोग्य अधिकाऱयांनी केला नाही. कामाचे कारण दाखवून आरोग्य अधिकाऱयांनी उपनगरातील एक वेळ काम दिले आहे. दोन वेळचे काम दिले तर कर्मचाऱयांच्या बदल्यांचा प्रश्न उदभवणार नाही. शहरामध्ये जास्तीतजास्त कामगारांची आवश्यकता आहे. इथे मोठय़ा प्रमाणात ओढे नाले, कचराकुंडी, व लोकसंख्या आहे. घाणीचे साम्राज्य देखील इथेच आहे. एवढेच सगळे उपनगरात पाठवणे योग्य नाही. उपनगरात काम करण्यास उत्सुक असणारे अनेक कामगार आहेत.
मात्र, कामगारांबरोबर संवाद न साधता मुकादम व आरोग्य अधिकाऱयांच्या मर्जीतील कामगारांना सुट मिळण्याचे आढळून येत आहे. अशा अडचणी असताना कामगारांच्या बदल्या करण्यास आमचा आक्षेप आहे. कोणतीही प्रक्रिया सुसंवादामधून झाली तर त्याचे फळही चांगले मिळते, अशी आमची धारणा आहे. म्हणून घाईगडबडीने अविचाराने व भेदभावातून केलेली बदल्याची प्रक्रिया स्थगीत करावी, अशी मागणी केली आहे.