मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला निरोप
प्रतिनिधी /डिचोली
नाव्हेली सांखळी येथील लक्ष्मीनारायण वारकरी मंडळाकडून यावषी प्रथमच आयोजित करण्यात आलेली पायीवारी पंढरपूरला जाण्यासाठी रवाना झाली. या वारीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या वारीला विशेष उपस्थिती लावून निरोप दिला. विठ्ठल भक्तीने चालत पंढरपूरला जाण्यासाठी निघालेल्या सर्व विठ्ठल भक्तांना यावेळी मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी या वारकरी मंडळाचे अध्यक्ष महादेव गावस व इतर वारकऱयांची, गावातील ग्रामस्थांची उपस्थिती होती.
सांखळी मतदारसंघातून यावषी प्रथमच पंढरपूर पायीवारीचे आयोजन करण्यात आले आहे. आमोणा गावातून एक वारी पंढरपूरला जाण्यासाठी निघाली आहे. तर दुसरी वारी नावेली गावातील लक्ष्मीनारायण मंदिराकडून निघाली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सर्व वारकऱयांना शुभेच्छा दिल्या. राज्यातील लोकांमधील भक्तीला उधाण आले आहे. यावषी मोठय़ा संख्येने विठ्ठलभक्त विविध वाऱयांच्या माध्यमातून पंढरपूरला पायी चालत गेले आहेत. ही चांगली बाब असून वारी करणे आणि श्रींचे दर्शन घेणे हा सर्वांगसुंदर अनुभव आहे, असे यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी म्हटले.