या घूसखोरीला प्रोत्साहन देणाऱयांचा शोध घ्यावा : गोव्याच्या आणि देशाच्या अस्तित्वासाठी धोकादायक प्रकार आहे.डिचोलीतील हिंदुत्ववादी संघटनांची मागणी
डिचोली/प्रतिनिधी
सध्या गोव्यातील दहशतवाद विरोध पोलीस पथकाकडून सुरू असलेली बांगलादेशी घुसखोरांच्ता विरोधातील कारवाई अधिक कडक करताना ताब्यात घेण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकांची कसून चौकशी व्हावी. बांगलादेशी घुसखोरी हा विषय गोवा आणि देशाच्या अस्तित्वासाठी धोकादायक असून या विषयाच्या मुळापर्यंत जाताना या घुसखोरांना प्रोत्साहन आणि अभय देणाऱया घटकांविरोधात मोहीम सरकारच्या संबंधित यंत्रणांनी हाती घ्यावी, अवी मागणी डिचोलीतील विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱयांनी पत्रकार परिषदेतून केली.
देशात सध्या सुमारे सात कोटींच्या घरात बांगलादेशी घुसखोर असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणेकडे आहे. हा गंभीर विषय असून सुरक्षा यंत्रणा सक्षम करून त्यांना त्यांच्या गावात पाठविण्याची मोहिम हाती घ्यावी. गोव्यात भंगार गोळा करण्याचा धंदा करणारे हे बांगलादेशी इतर कोणत्याही कृत्यांमध्ये सहभागी आहेत का ? याची चौकशी करावी. कारण वाळपई येथून ताब्यात घेण्यात आलेल्या बिलाल आखोन याने काही महिन्यांपूर्वी गोव्यात झालेल्या एटीएम फोडीतील आरोपींना बाहेर सुटण्यासाठी मदत केल्याची माहिती मिळली आहे. तसेच सदर बिलाल हा गोव्यात बांगलादेशींना आश्रय देण्यासाठी, पोलिसांपासून लपवून ठेवण्यासाठी कार्यरत असल्याचेही समजले आहे. त्यामुळे त्याला अटक करून त्याची अशा गुन्हेगारी लोकांशी संबंध आहेत का ? देशविरोधी कारवायांमध्ये सहभाग आहे का ? याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी यावेळी हिंदू जनजागृती समितीचे गोविंद चोडणकर यांनी केली.
डिचोली हि सांस्कृतिक ठेव असलेली भुमी असून या भुमीत सध्या असंस्कृत घटना घडू लागल्या आहेत. राज्याच्या बाहेरून आलेले व येथे स्थायिक झालेल्या एका विशिष्ट धर्मातील लोकांकडून धार्मिक आणि इतर असमर्थनीय गोष्टी करून धर्माचे नाव खराब केले जाते. हि बाब गोव्यातील “त्या” धर्मिय बांधवांनाही माहित आहे. तेही यावर खेद व्यक्त करतात. या प्रकारांकडे गोव्यातील लोकांनी विशेषतः हिंदू बांधवांनी गांभिर्याने पहावे लागणार. भाडय़ाच्या खोल्यांमध्ये भाडय़ासाठी ठेवण्यात येणाऱया परप्रांतीय लोकांची पूर्ण चौकशी करूनच पाऊल उचलावे. असे आवाहन हिंदू राष्ट्र संघटनेचे सुबोध मोने यांनी केले.
पोलीस आपले काम योग्यरीत्या करीत आहेत. त्यांना सहकार्य देण्याची गरज आहे. अवा संशयास्पद व्यक्तींची माहिती वेळोवेळी पोलिसांना किंवा गुप्तचर यंत्रणांना दिल्यास ती एक देशभक्तीच ठरणार. तसेच पोलिसांकडून परप्रांतीय व संशयास्पद लोकांची ओळख पटविण्यासाठी विशेष मोहिम हाती घेणे आवश्यक आहे. त्याची वाहने तपासावी. भाडय़ाच्या खोलीमध्ये कोण येतो व जातो यावरही लक्ष ठेवणे आवश्यक आहे, असेही सुबोध मोने यांनी म्हटले.
यावेळी भारत माता की जयचे मुकू?द कवठणकर यांनी, सध्या राज्यात व देशात बांगलादेशी, रोहिंग्या अफगाणी व इतर देशातील लोकांची होणारी घुसखोरी हा गंभीर व चांतेचा विषय बनला आहे. हा विषय केवळ गोव्याचा नसून तो संपूर्ण देशाचा आहे. हि प्रकरणे कोणामुळे घडत आहेत ? बांगलादेशी पश्चिम बंगाल राज्यातून भारतात प्रवेश करतात. या परराष्ट्रीय लोकांच्या घुसखोरी संदर्भात केंद्र सरकारला देशातील सीमावर्ती राज्ये सहकार्य करीत नाहीत. अशा राज्यांना बरखास्त करून त्या राज्यांमध्ये तत्काळ राष्ट्रपती राजवट लागू करावी व हि घुसखोरी व अन्य अवेध्य प्रकार थांबवावे. केंद्र सरकारने इच्छाशक्ती दखविल्यास हे सर्व शक्मय आहे. असे म्हटले
या पत्रकार परिषदेला शिवप्रति÷ान हिंदुस्थानचे मंदार गावडे, सिध्देश सावंत, भारत माता की जयचे शैलेश जाधव, घनश्याम कुंकळकर, रोहन शिरगावकर, पापुराज मयेकर, भोलानाथ गाड, बजरंग दलाचे प्रशांत नाईक, शिवप्रेमी गोविंद साखळकर आदींची उपस्थिती होती.